Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

पाण्याचं महाभारत आणि आधुनिक द्रौपदी

  मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र फिरलोय. राज्यात पडलेला दुष्काळ खासकरून जवळून बघितला, त्यावरून झालेलं राजकारणही बघितलं. या दुष्काळाच्या काळात एक बातमी ही आजही मला चांगल्या पद्धतीने लक्षात आहे. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या शहापूरपासून जवळच एक डेंगणमाळ नावाचं गाव आहे. या गावातील महिला टकल्या व्हायला लागल्या होत्या. केस जाण्यामागचं मुख्य कारण होतं ते पाण्याचं दुर्भिक्ष. ही बातमी करायला गेलो असताना मला भलतीच बातमी सापडली. डेंगणनमाळ अत्यंत गरीब आणि आदिवासी गाव आहे. मुंबई ठाण्यासारखी शहरं जवळ असूनही हे गाव काही सुधारलेलं नाही. या गावातील महिला टकल्या व्हायला सुरुवात झाल्याचं कळालं. गावात गेलो. विचारलं की काय होतंय, कशामुळे या महिलांचे केस जायला लागले? यावर त्या महिला म्हणाल्या की आमचा अख्खा दिवस पाणी आणण्यात जातो. एखा खेपेत जमेल तेवढं पाणी आणायचा प्रयत्न असतो. हंडा जड असतो, डोक्यावर घेऊन चालत येताना केस ओढले जातात आणि मुळापासून तुटतात, हे गेलेल केस काही परत येत नाही, परिणाम असा की टक्कल पडायला लागलं. महिलांशी बोलत असताना एक माणूस भेटला, त्याच्याशी बोलत असताना तो म्हणाला की या गावात

गावाकडचे सुपरस्टार

युट्यूब आणि फेसबुकवर बी युनिक (BeYouNick) नावाचा चॅनेल चालवला जातोय. निकुंज लोटिया आणि तुषार खेर यांनी त्यांच्या साथीदारांना सोबत घेऊन उभा केलेला तो चॅनेल आहे. हा चॅनेल ख...त...र...ना...क हिट झालाय.पडद्यावर जेवढी हे दोघे धमाल करतात तेवढीच त्यांच्या चॅनेलची कहाणीही धमाल आहे. मुंबई आणि उपनगरातील मंडळी उपहासाने डोंबिवलीला गाव म्हणतात, मी जिथे मिळेल तिथे त्याला ठोकून काढत डोंबिवली हे गाव नाही ते शहर आहे हे सांगत असतो. ठाणे आणि डोंबिवली ही दोन शहरं पत्रकारांची खाण आहे, अत्यंत नावाजलेली पत्रकार मंडळी, संपादक हे डोंबिवलीतून आले आहेत हे अनेकांना माहिती नाहीये. असो, हा विषय थोडा बाजूला ठेवूया आणि Be YouNick बद्दल बोलूयात. डोंबिवलीसारख्या शहरातील दोन तरुणांनी एकत्र येऊन एक युट्युब चॅनेल सुरू केला आणि तो इतका हिट झाला की आज या दोघांंचं आणि त्यांच्या चॅनेलचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे.   निकुंज हा पूर्वी फ्रीलांस बारटेंडर म्हणून काम करत होता, तर तुषार खेर हा इंजिनिअर म्हणून सिमेन्ससारख्या कंपनीत काम करणारा होता. एका जिममध्ये या दोघांची भेट झाली असं दोघांनी एका युट्यूब चॅने

प्रसारमाध्यमांनी गायब केलेले एसी सरकार

  मला आदिवासी समाजाबद्दल प्रचंड कुतूहल वाटत आलंय. देशाच्या कोणत्याही भागात जा, तुम्हाला विविध आदिवासी जमाती सापडतील. अगदी काँक्रीटचे जंगल असलेल्या मुंबईतही आदिवासी आहेत. काँक्रीटचे जंगल विरूद्ध खरे जंगल या संघर्षात सातत्याने चेपला गेलेला ,शहराशी आणि शहरातील मानवी श्वापदांशी बुजून वागणारा आदिवासी समाज हा त्याच्या रितीरिवाजांसाठी ओळखला जाणारा आहे. ‘ जल,जमीन,जंगल ’ याला सर्वस्व मानणाऱ्या आदिवासी समाजामध्ये एसी सरकार नावाची संकल्पना सुरू झाली होती, मात्र आज ती फक्त आदिवासींनाच माहिती आहे, शहरी भागातील लोकांना आणि प्रसारमाध्यमांना त्याची पुसटशीही कल्पना नाही.  'न्यू'  इज 'न्यूज'  किंवा NORTH, EAST,SOUTH,WEST म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घटना म्हणजे न्यूज असं समीकरण आजही पक्कं डोक्यात बसलेलं आहे. असं असूनही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या या व्याख्येत, परिमाणात बसूनही दिसत नाहीत किंवा दाखवल्या जात नाही. एसी सरकार ही त्यातलीच एक गोष्ट आहे. 2014 च्या निवडणुका कव्हर करायला गेलो असताना नंदूरबारमध्ये माझा मित्र भिकेश पाटील याने सर्वात पहिल्यांदा एसी सरकार

घर बसल्या गुप्तहेर बनविणारे फेसबुक

काही दिवसांपूर्वी व्हॉटसअपवर एक मेजेस आला होता. पूर्वी मूलभूत गरजा या तीन होत्या अन्न, वस्त्र आणि निवारा. या मूलभूत गरजा आता पाच झाल्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा व्हॉटसअप आणि फेसबुक. टाईमपाससाठीचं हे साधन आता लोकांच्या उपयोगी पडू लागलंय. मात्र याचे दुष्परिणाम हे न दिसणारे आहेत. मी फेसबुक वापरतो, त्यामुळे ते पूर्णपणे वापरणं थांबवा असं सांगण्याचा मला नैतिक अधिकार नाही. फेसबुक कसं वापरायला पाहीजे हे मात्र मी नक्की सांगू शकेन. काही महिन्यांपूर्वी मी ठाण्यावरून पुण्याला जात होतो. प्रवासामध्ये माझ्या शेजारी बसलेल्या प्रवाशाची बस थांबली तेव्हा ओळख झाली. मी मराठीला अँकरींग करताना त्यांनी पाहीलं होतं. बोलण्याच्या ओघात कळालं की त्यांचं नाव स्वप्नील शिंदे असं होतं. बंगळुरूमध्ये एका अत्यंत मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ते फारच मोठ्या पदावर कामाला आहेत. असं असूनही माणूस एकदम साधा आणि मनमोकळा होता. बोलताना त्यांनी मला माहिती नसलेल्या मुद्दावर बोलायला सुरूवात केली. फेसबुकवरून ठेवली जाणारी पाळत असा त्यांचा विषय होता. भलत्याच इंटरेस्टींग पद्धतीने त्यांनी सांगायला सुरूवात केली. त्यांचा एका ओळ

ढेबरे विगमास्टर

गेल्या काही दिवसात दोन मराठी चित्रपट अभिनेते चर्चेत आलेत. पहिला म्हणजे सचिन पिळगांवकर आणि त्याच्याचमुळे चर्चेत आलेला स्वप्नील जोशी. विग लावून नाचणारे, सुटलेली पोटं घेऊन कॉलेजमधल्या तरुणाची भूमिका करणारे हे नायक मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले, असं म्हणतात. मात्र, ज्या प्रतिक्रिया सचिन पिळगांवकरांच्या गाण्यावर आल्या त्या पाहता तो फक्त भ्रम होता, असं ठामपणे वाटायला लागलं आहे. सचिन पिळगांवकर ज्यांना आज मराठी चित्रपट सृष्टीत महागुरू म्हणून टोपणनाव दिलं गेलंय, त्यांची काही दिवसांपूर्वी मनसोक्त भंकस केली गेली. ज्या पद्धतीने त्यांच्या ‘ मुंबई अँथम’ वर प्रतिक्रिया आल्या त्या पाहता त्यांना सोशल मिडीयावरून हाणण्यासाठी लोकं टपून बसली होती असं स्पष्टपणे जाणवायला लागलं आहे. सचिननंतर स्वप्नील जोशीचा नंबर आहे हे सचिनच्या व्हिडीओवर आणि नंतर त्याने लिहलेल्या फेसबुक पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येतंय. हा राग का ? इतरांवर तो का नाही ? याचा विचार होणं गरजेचं आहे. सचिननंतर स्वप्नील जोशीचा नंबर आहे, हे सचिनच्या व्हिडीओवर आणि नंतर त्याने लिहलेल्या फेसबुक पोस्टवर आलेल्या प्र

सीबीआय नावाचा पोपट आणि आय़ुष्यातून उठलेला वैज्ञानिक

नंबी नारायणन सर्वोच्च न्यायालयाने नंबी नारायण या इस्रोच्या वैज्ञानिकाला ५० लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश नुकताच दिलाय. या नंबी नारायणन यांच्या विस्ताराने बातम्या प्रसिद्ध झाल्या, मात्र आजही सामान्य जनतेला विचारा की नंबी  नारायणन माहिती आहे का ? यावर त्यांच्या तोंडावरचे भाव ‘काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोय’ असे दिसायला लागतील. हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे. या देशात अमेरिकेतील सगळी लफडी ठावूक असतात, इस्रायल-पॅलेस्टीनच्या वादाबद्दल माहिती असते, सनी लिओनी तोंडपाठ असते मात्र नंबी  नारायणन कोणाला माहिती नसतो. केवळ यासाठीच हा ब्लॉग लिहणं गरजेचं वाटतंय. नंबी  नारायणन इस्रोचे एक मोठे वैज्ञानिक, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी संशोधन करणारं एक मोठं नाव. द्रव स्वरुपातील इंधनावर त्यांचे सातत्याने काम सुरू होते. ९० च्या दशकात अंतराळात बहुपयोगी ठरणारे उपग्रह पाठवायची सत्ताधाऱ्यांची जबरदस्त इच्छा होती. मात्र हे उपग्रह वाहून नेण्यासाठी ताकदवान रॉकेटची गरज असते. क्रायोजनिक इंजिन ही या रॉकेटसाठी वापरली जात होती. अमेरिकेसह फक्त ५ देश असे ह

मी पाहिलेला शहरी नक्षलवाद

सुधीर ढवळे शहरी नक्षलवाद, पुरोगामी, प्रतिगामी, डावे, उजवे अशी बरीच चर्चा सातत्याने सुरू असते. शहरी नक्षलवाद असा प्रकारच अस्तित्वात नाही असा बचाव डाव्या चळवळीतील काही मंडळींकडून सातत्याने ऐकायला मिळतो. पत्रकारिता करीत असताना मला जो अनुभव आला तो या मंडळींच्या दाव्यांच्या चिंधड्या उडविणारा होता. ईटीव्ही मराठी साठी फिल्ड रिपोर्टींग करायला मला मुंबईला पाठवण्यात आलं. अत्यंत संवेदनशीलपणे पत्रकारिता करणारी वृत्तवाहिनी म्हणून त्याकाळी हे न्यूज चॅनेल ओळखलं जायचं. मुंबईचे ब्युरो चीफ राजेंद्र साठे यांचा आग्रह असायचा की लहानात लहान बातमीही कव्हर झाली पाहीजे. ईटीव्हीमध्ये आझाद मैदानावरील आंदोलने ही नियमितपणे कव्हर केली जात होती. अनेक आंदोलनं अशी असायची ज्यात आंदोलन करणारा एक माणूस आणि त्याच्यासमोर बूममाईक घेतलेला पत्रकार आणि कॅमेरामन असे फक्त तीनच जण मैदानात असायचे. बंदोबस्तावरील पोलीसही असल्या दृश्यांची मजा घ्यायचे. आता आझाद मैदानात मेट्रोचं काम सुरू झालंय, त्यामुळे आंदोलनं, उपोषणं पूर्वीसारखी होत नाही कारण त्यांना परवानगीच मिळत नाही. या आंदोलनांच्या कव्हरेज दरम्यान डाव्या चळवळीशी निगडीत अन