Skip to main content

घर बसल्या गुप्तहेर बनविणारे फेसबुक


काही दिवसांपूर्वी व्हॉटसअपवर एक मेजेस आला होता. पूर्वी मूलभूत गरजा या तीन होत्या अन्न, वस्त्र आणि निवारा. या मूलभूत गरजा आता पाच झाल्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा व्हॉटसअप आणि फेसबुक. टाईमपाससाठीचं हे साधन आता लोकांच्या उपयोगी पडू लागलंय. मात्र याचे दुष्परिणाम हे न दिसणारे आहेत. मी फेसबुक वापरतो, त्यामुळे ते पूर्णपणे वापरणं थांबवा असं सांगण्याचा मला नैतिक अधिकार नाही. फेसबुक कसं वापरायला पाहीजे हे मात्र मी नक्की सांगू शकेन.

काही महिन्यांपूर्वी मी ठाण्यावरून पुण्याला जात होतो. प्रवासामध्ये माझ्या शेजारी बसलेल्या प्रवाशाची बस थांबली तेव्हा ओळख झाली. मी मराठीला अँकरींग करताना त्यांनी पाहीलं होतं. बोलण्याच्या ओघात कळालं की त्यांचं नाव स्वप्नील शिंदे असं होतं. बंगळुरूमध्ये एका अत्यंत मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ते फारच मोठ्या पदावर कामाला आहेत. असं असूनही माणूस एकदम साधा आणि मनमोकळा होता. बोलताना त्यांनी मला माहिती नसलेल्या मुद्दावर बोलायला सुरूवात केली. फेसबुकवरून ठेवली जाणारी पाळत असा त्यांचा विषय होता. भलत्याच इंटरेस्टींग पद्धतीने त्यांनी सांगायला सुरूवात केली. त्यांचा एका ओळखीतल्या मुलाला अचानक धमक्या यायला लागल्या होत्या. मुलगा खूप घाबरला आणि विचित्र वागायला लागला. हा प्रकार त्याच्या आईने शिंदेंना सांगितला, त्यांनी या मुलाची फेसबुक टाईमलाईन बघितल्यानंतर त्यांना खरा प्रकार लक्षात आला. एका कॉमेंटमुळे काही धर्मांध मुसलमानांनी या शाळकरी मुलाला धमक्या दिल्या होत्या.

शिंदे यांच्या बोलण्यातून एक गोष्ट कळाली ती म्हणजे की तुम्ही आभासी जगात अजिबात सुरक्षित नाही. जितके तुम्ही फेसबुकच्या अधीन जाल तेवढे तुम्ही उघडे नागडे होत जाल. डेटा चोरी प्रकरणी मधल्या काळात मोठा गहजब झाला होता. तुमच्या आवडीनिवडी फेसबुक गुपचूपपणे संकलित करून ठेवत असते. या आवडीनिवडी काही कंपन्यांना विकण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये अमेरिकेतील राजकीय पक्षही सामील होते. यानंतर बऱ्याच सुरक्षा उपाययोजना केल्याचा दावा फेसबुकने केलाय. मात्र तरीही तुम्ही सुरक्षित नाही.

फेसबुकवर आपण सहजपणे Travelling to Singapore असा मॅप शेअर करून मोकळे होतो, सिंगापूरला निघालेल्या सगळ्या मंडळींचे एअऱपोर्टवरचे फोटो काढून लगेच अपलोड करतो. बास्स मी चोराला इतकी माहिती पुरेशी आहे. तुम्ही घरी नाही आणि पुढचे २-३ दिवस तरी येणार नाही हे कळतं. मग घरी येईपर्यंत तुमचं घर साफ झालेलं असतं.


मध्य प्रदेशात एका तरुणीची हत्या झाली. हत्या करणारा तिचा लहानपणीचा मित्र होता ज्याने फेसबुकवरून तिचा पत्ता शोधून काढला होता, फेसबुकवरूनच त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती, ज्याला तिने नकार दिल्याने त्याने तिचा खून केला.


नोयडामध्ये एका महिलेला ती फेसबुकवरून चॅट करत असलेल्या माणसाने फुलांचा बुके आणि केक पाठवला. सुरुवातीला या महिलेशी आरोपी सभ्यपणे बोलत होता नंतर त्याने अश्लील संभाषण करायला सुरूवात केली होती


हैद्राबादमध्ये एका तरुणाने त्याच्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे फेसबुकवरून फोटो डाऊनलोड केले आणि SEX साठी मला कॉल करा असे मेसेज टाकून तिचा नंबर व्हायरल केला.


फेसबुकने त्यांच्याच एका सुरक्षा अभियंत्याला साठवून ठेवलेली ठेवलेली माहिती मिळवत शेकडो महिलांना अश्लील संदेश पाठवले होते.


फेसबुकवर तुम्ही जे काही मांडता त्यातून तुमची आवड, तुमचा कल, विचारसरणी, खासगी गोष्टी फोटो, व्हिडीओ अशा हजारो गोष्टी जगभरातील लाखों लोकांना सहजपणे कळू शकतात. याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, त्यामुळे फेसबुक वापरताना लिमिटमध्ये राहा. काही लोकांना सवय असते सकाळी उठल्यापासून मी दात घासतोय/घासतेय पासून आता रात्री मी झोपतो/झोपते इथपर्यंत सगळे मेसेज टाकण्याची. ही सवय त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. फेसबुक हे फोटो अपलोड करण्यासाठी अत्यंत धोकादायक ठिकाण आहे. हे फोटो मॉर्फींग करून अश्लील फोटो बनवले जाण्याची दाट शक्यता असते. हे प्रकार टाळले तर सुरक्षित आणि सुखी समाधानी जीवन जगण्याचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो.

Comments

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...