Skip to main content

प्रसारमाध्यमांनी गायब केलेले एसी सरकार


 

मला आदिवासी समाजाबद्दल प्रचंड कुतूहल वाटत आलंय. देशाच्या कोणत्याही भागात जा, तुम्हाला विविध आदिवासी जमाती सापडतील. अगदी काँक्रीटचे जंगल असलेल्या मुंबईतही आदिवासी आहेत. काँक्रीटचे जंगल विरूद्ध खरे जंगल या संघर्षात सातत्याने चेपला गेलेला ,शहराशी आणि शहरातील मानवी श्वापदांशी बुजून वागणारा आदिवासी समाज हा त्याच्या रितीरिवाजांसाठी ओळखला जाणारा आहे. जल,जमीन,जंगल याला सर्वस्व मानणाऱ्या आदिवासी समाजामध्ये एसी सरकार नावाची संकल्पना सुरू झाली होती, मात्र आज ती फक्त आदिवासींनाच माहिती आहे, शहरी भागातील लोकांना आणि प्रसारमाध्यमांना त्याची पुसटशीही कल्पना नाही. 


'न्यू'  इज 'न्यूज'  किंवा NORTH, EAST,SOUTH,WEST म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घटना म्हणजे न्यूज असं समीकरण आजही पक्कं डोक्यात बसलेलं आहे. असं असूनही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या या व्याख्येत, परिमाणात बसूनही दिसत नाहीत किंवा दाखवल्या जात नाही. एसी सरकार ही त्यातलीच एक गोष्ट आहे. 2014 च्या निवडणुका कव्हर करायला गेलो असताना नंदूरबारमध्ये माझा मित्र भिकेश पाटील याने सर्वात पहिल्यांदा एसी सरकारबद्दल सांगितलं. विषय एवढा फॅनस्टॅस्टीक होता की निवडणुकीचं काम थोड्यावेळ बाजूला ठेवून मी ते ऐकत बसलो होतो. 

एसी सरकार म्हणजेच एन्टे ख्राईस्ट (AC) म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीपासून अस्तित्वात असलेले सरकार. मी आधी म्हटल्यापूर्वी भूमीपुत्र कोण यावरून बराच वाद आहे, मात्र आदिवासी हे खरे भुमिपुत्र आहे हे कोणीच नाकारू शकत नाही.  या आदिवासींचंही तेच म्हणणं आहे की आम्ही ख्रिस्ताने जन्म घ्यायच्या आधीपासून इथे आहोत, आणि इथे इतर कोणाचं नाही तर आमचं सरकार आहे. या भावनेतूनच एसी सरकार अशी मोहीम सुरू करण्यात आली. केसरी सिंह हे या मोहीमेचे शिल्पकार असल्याचं सांगितलं जातं. ही मोहीम आता त्यांचा मुलगा रवींद्र सिंह चालवतात. यांच्या कल्पना आणि विचार शहरी भागातील वाचकांना खुळचटपणाच्या वाटतील मात्र ते मला जाम मस्त वाटल्या. या कल्पना,विचारांमागे त्यांचे स्वत:चे तर्कही आहेत. त्यांचे विचार काय आहेत ते आधी आपण पाहूयात.


  • आईवडील हे या समूहामध्ये देवाच्या जागी मानले जातात
  • आईवडीलांना २ अंगठे छातीशी धरून नमस्कार करण्याची पद्धत आहे
  • वंदन करण्यासाठी ‘ स्वकर्ता पितु की जय’ असं म्हटलं जातं
  • समूहातील प्रत्येकजण नावापुढे एसी शब्द लावतात आणि त्यानंतर स्वत:चं नाव लावतात
  • सरकारी एकही दस्तावेज या समूहातील लोकांना मान्य नाही, रेशन कार्ड-आधार कार्ड याला ही मंडळी मानत नाहीत
  • शासकीय योजनांचा ही मंडळी कधीही लाभ घेत नाहीत

देशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी समाज विखुरलेला आहे, मात्र एसी सरकार मानणारे आदिवासी हे प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यातील आहेत. एसी सरकारबाबतच्या कल्पना हास्यास्पद वाटत असल्या तरी त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत ज्या आजपर्यंत स्वत:ला पुढारवादी म्हणवणाऱ्या किंवा सुसंस्कृत समाजाला अंगीकारता आलेल्या नाहीत. या गोष्टी कोणत्या आहेत त्यादेखील आपण पाहूयात

  • एसी सरकार समूह जात,पात,धर्म,पंथ मानत नाही. या मंडळींसाठी एसी सरकार हेच सबकुछ आहे.
  • ही मंडळी कर्ज घेण्याच्या सक्त विरोधात आहेत
  • ही मंडळी स्वत:ची जमीन कधीही विकत नाही
  • रुढीपरंपरा, कर्मकांड,रितीरिवाजही ही मंडळी मानत नाहीत
  • हे लोक निसर्ग पूजक असतात त्यामुळे जंगलाच्या आणि वन्यजीवांचे रक्षण करणे त्यांची मुख्य जबाबदारी समजतात
  • या आदिवासी समाजातील लोकांचा बाल विवाहाला विरोध आहे
  • एसी सरकार समूह व्यसनांच्या सख्त विरोधात आहे, या समूहाने आदिवासी भागात व्यसनमुक्ती साठी मोठी चळवळ उभारली आहे.

ही मंडळी एक रुपयाच्या जुन्यानोटेला फार मानतात, याचं कारण देखील आम्ही समजून घेतलं. या जुन्या नोटेवर भारत सरकार लिहलेलं आहे, बाकी सगळ्या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया केंद्र सरकारद्वारा प्रत्याभूत असं लिहलेलं आहे. 



जुन्या नोटेवर कोणाचीही सही नाहीये, मात्र इतर सगळ्या नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. यामुळेच बाकी सगळ्या नोटा एसी सरकार मानत नाही. एसी सरकार मानणाऱ्या आदिवासींचं दरवर्षी संमेलन आयोजित केलं जातं, मात्र त्याची सिंगल कॉलम बातमी किंवा, एक फ्रेम व्हिज्युअल्सही कुठे दिसत नाही. अण्णा अण्णा असं म्हणणारा (तसा आवाज अजिबात येत नसूनही) कोंबडा, ढगांचे प्रकार, स्वर्गाची शिडी असल्या कुठल्याही विषयावर बातम्या होऊ शकतात मात्र एसी सरकारची एकही बातमी होत नाही याचं आश्चर्य वाटतं. एसी सरकार काळानुरुप बदलेलं आहे, नेत्यांकडे एक्सयूव्ही सारख्या गाड्या यायला लागलेल्या आहेत. हा पैसा कुठून आला, समाज कसा पुढारला याची चौकशीही कोणी करायला तयार नाही. जी मंडळी लोकनियुक्त सरकार मानत नाही, त्यांची निवडणुकीबाबत आता काय भूमिका आहे, नक्षलवादाच्या समस्येबद्दल काय वाटतं हे देखील कोणाला विचारावंस वाटत नाही. हा समूह लोकांपुढे न येण्यामागे माध्यमं हे महत्वाचं कारण आहे.

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क