Skip to main content

पाण्याचं महाभारत आणि आधुनिक द्रौपदी

 

मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र फिरलोय. राज्यात पडलेला दुष्काळ खासकरून जवळून बघितला, त्यावरून झालेलं राजकारणही बघितलं. या दुष्काळाच्या काळात एक बातमी ही आजही मला चांगल्या पद्धतीने लक्षात आहे. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या शहापूरपासून जवळच एक डेंगणमाळ नावाचं गाव आहे. या गावातील महिला टकल्या व्हायला लागल्या होत्या. केस जाण्यामागचं मुख्य कारण होतं ते पाण्याचं दुर्भिक्ष. ही बातमी करायला गेलो असताना मला भलतीच बातमी सापडली.

डेंगणनमाळ अत्यंत गरीब आणि आदिवासी गाव आहे. मुंबई ठाण्यासारखी शहरं जवळ असूनही हे गाव काही सुधारलेलं नाही. या गावातील महिला टकल्या व्हायला सुरुवात झाल्याचं कळालं. गावात गेलो. विचारलं की काय होतंय, कशामुळे या महिलांचे केस जायला लागले? यावर त्या महिला म्हणाल्या की आमचा अख्खा दिवस पाणी आणण्यात जातो. एखा खेपेत जमेल तेवढं पाणी आणायचा प्रयत्न असतो. हंडा जड असतो, डोक्यावर घेऊन चालत येताना केस ओढले जातात आणि मुळापासून तुटतात, हे गेलेल केस काही परत येत नाही, परिणाम असा की टक्कल पडायला लागलं. महिलांशी बोलत असताना एक माणूस भेटला, त्याच्याशी बोलत असताना तो म्हणाला की या गावात पाण्यासाठी जाम वणवण करावी लागते. घरातल्या सगळ्या बायका दिवसभर पाणी भरण्याचंच काम करतात. काहींनी तर पाणी भरण्यासाठी ४-५ लग्नही केली आहेत. मला भयंकर आश्चर्य वाटलं, मी त्यांना विचारलं, तुमच्या कोणी ओळखीचं आहे का ? त्यावर त्याने होय म्हणून मान हलवली आणि माझ्यामागे या असं म्हणून गावातल्या पायवाटेने चालायला सुरुवात केली. 

मला ज्या घरात नेण्यात आलं ते दादू भगत होतं, त्यावेळी त्यांचं वय जवळपास ५९-६० च्या घरात होतं. त्यांनी थोडंसं लाजत लाजतच एक फोटो दाखवला त्यांच्यासोबत तीन महिला उभ्या होत्या ज्या त्यांच्या पत्नी होत्या. असं का? इतकी लग्न कशासाठी? असे दोन-तीन प्रश्न गोळीसारखे तोंडातून निघून गेले. मान खाली घालून ते म्हणाले की पहिली बायको जेव्हा गर्भवती होती, तेव्हा घरात पाणी भरण्यासाठी कोणी राहिलं नाही. मी एकटा आणून आणून किती पाणी आणणार. डोक्यावरून पाणी आणण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीये, त्यामुळे मी दुसरं लग्न केलं. घरातील लोकांची संख्या वाढली तशी पाण्याची गरजही वाढली म्हणून तिसरं लग्न केलं. दुपारी उन्हाचा कडाका असल्याने पाणी भरता येत नाही. जे पाणी भरायचं ते ऊन चढायच्या आत आणि दिवस मावळायच्या पहिले भरायला लागतं. त्यामुळे भगत यांच्या घरात पाणी भरायला दोन महिला शिफ्टनुसार काम करायच्या एक महिला चूल आणि मूल सांभाळायची. महिलेचा नवरा गेला तर विधवेशी पुन्हा विवाह करण्याची पद्धतीही आदिवासींमध्ये आहे, त्यामुळे पाण्यासाठी पुरुष या विधवा महिलांसोबत लग्न करायचे ही परिस्थिती बघितल्यानंतर मला द्रौपदीची आठवण आली. महाभारतातील द्रौपदीने पांडवांसोबत संसार केला होता. इथल्या महिलांनीही परिस्थितीमुळे द्रौपदीत्व स्वीकारलं आणि एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत लग्न केलं.

ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. भातसा धरण या गावापासून जवळच आहे, तरीही गावांना पाणी मिळत नाही. नळपाणी योजना आणणं तर दूरच राहीलं या पाड्यांना टँकरनेही पाणी पुरवठा केला जात नव्हता. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी या पाड्यांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेस युतीचं सरकार सत्तेत असतानाही ते इथले आमदार होते. जलसंपदा खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असूनही या गावांसाठी, पाड्यांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली नव्हती. ती फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर करण्यात आली होती. जर या सरकारला ते शक्य झालं तर ते मागच्या सरकारला का शक्य झालं नाही हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. गेल्या सरकारने हे काम केलं असतं तर त्यांच्यात आमदारांचं नाव झालं असतं. डेंगणमाळमधला फक्त पाण्याचा प्रश्न सुटला नसता तर एकापेक्षा जास्त लग्न करण्याची प्रथाही बंद झाली असती. दुष्काळ हा फक्त पाण्याची समस्याच घेऊन येत नाही, तर त्यासोबत असंख्य संकट आणि अडचणी घेऊन येतो हे डेंगणमाळने दखवून दिलं.

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क