Skip to main content

ढेबरे विगमास्टर





गेल्या काही दिवसात दोन मराठी चित्रपट अभिनेते चर्चेत आलेत. पहिला म्हणजे सचिन पिळगांवकर आणि त्याच्याचमुळे चर्चेत आलेला स्वप्नील जोशी. विग लावून नाचणारे, सुटलेली पोटं घेऊन कॉलेजमधल्या तरुणाची भूमिका करणारे हे नायक मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले, असं म्हणतात. मात्र, ज्या प्रतिक्रिया सचिन पिळगांवकरांच्या गाण्यावर आल्या त्या पाहता तो फक्त भ्रम होता, असं ठामपणे वाटायला लागलं आहे.







सचिन पिळगांवकर ज्यांना आज मराठी चित्रपट सृष्टीत महागुरू म्हणून टोपणनाव दिलं गेलंय, त्यांची काही दिवसांपूर्वी मनसोक्त भंकस केली गेली. ज्या पद्धतीने त्यांच्या ‘ मुंबई अँथम’ वर प्रतिक्रिया आल्या त्या पाहता त्यांना सोशल मिडीयावरून हाणण्यासाठी लोकं टपून बसली होती असं स्पष्टपणे जाणवायला लागलं आहे. सचिननंतर स्वप्नील जोशीचा नंबर आहे हे सचिनच्या व्हिडीओवर आणि नंतर त्याने लिहलेल्या फेसबुक पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येतंय. हा राग का ? इतरांवर तो का नाही ? याचा विचार होणं गरजेचं आहे.


सचिननंतर स्वप्नील जोशीचा नंबर आहे, हे सचिनच्या व्हिडीओवर आणि नंतर त्याने लिहलेल्या फेसबुक पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येतंय. हा राग का? इतरांवर तो का नाही? याचा विचार होणं गरजेचं आहे.

सचिन आणि स्वप्नील जोशी या दोघांमधील एक समानता आहे ती म्हणजे दोघेजण विग घालतात, लाडात आल्यासारखा अभिनय करतात आणि अनेकदा ओव्हर अॅक्टिंग करतात. कृष्णा या हिंदी मालिकेमुळे स्वप्नील जोशी लहानपणातच भलताच प्रसिद्ध झाला होता. सचिन पिळगांवकरही बालकलाकार म्हणून काम करत करत नावारुपाला आले. लहानपणापासून प्रसिद्धीची सवय लागलेल्या सचिन यांच्या डोक्यात फार पूर्वीपासून हवा गेलेली आहे. अभिनयापेक्षा ते त्यांच्या अतिसार होईपर्यंत जडजड शब्दांच्या फेकाफेकीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना हिंदी आणि उर्दू चांगली समजते म्हणून ते गुलजार यांच्यासारखे सगळीकडे शेर, गजल ऐकवायला लागले तर आवडेल का? मात्र हा प्रश्न त्यांच्या मनालाही शिवत नाही.


गर्वाची बाधा ही गॅससारखी असते, अंगात भरली की माणूस उडायला लागतो. सुदैवाने स्वप्नील जोशीला तशी हवा अद्याप लागलेली नाही, त्याने पाय अजून तरी जमिनीवर ठेवलेले दिसतायत. मात्र हे दोघेही नायक, अभिनयाच्या कसोटीवर तपासून पाहताना अभिनयाच्या नावाखाली अतिशयोक्ती केल्यासारखे वाटतात. दुनियादारीमध्ये स्वप्नील जोशीला अकरावीत प्रवेश घेणारा विद्यार्थी दाखवणं हा म्हणजे कहर होता. सचिन पिळगांवकरांना आजही मुख्य नायकाची भूमिका दिली तर ते करायला एका पायावर तयार होतील. आपण निवृत्ती केव्हा घ्यावी, हा संकेत आपलं मन देत असतं. पिळगांवकरांचं हे अंतर्मन बहुधा ‘मुंबई अँथम’ ऐकल्यानंतर आत्महत्या करायला गेलं असावं.


चित्रपटसृष्टीमध्ये सध्याच्या घडीला नुसते देखणेच नाही, तर उत्तम अभिनयक्षमता असलेले बरेच नट आहेत, ज्यांना पुरेशी संधी मिळालेली नाही. गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी हे यापैकी आघाडीचे नट आहेत. विचार करून पाहा की जर यातील कोणाला ‘शर्यत’, ‘सांगतो ऐका’, ‘दुनियादारी’ , ‘मुंबई-पुणे-मुंबई’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका दिली असती तर तो चित्रपट कसा बनला असता. माझ्यामते आत्ताच्यापेक्षा तो नक्कीच चांगला बनला असता.

पोटं सुटलेले, थोराड दिसणारे नट विशीतील नट्यांबरोबर उड्या मारत नाचतानाचा ट्रेंड दक्षिणेकडील चित्रपटांनी आणला. तो मराठीमध्येही आणण्यात आला. किती प्रेक्षकांना तो आवडला हे सांगता येणं कठीण आहे, कारण तुफानी पीआर, आऊटडोअर कँपेन राबवून चित्रपट उचलला जाऊ शकतो हे ‘झी’ ने सिद्ध केलंय. या अशा ढेबऱ्या (पोटं सुटलेल्या) विग घालून काम करणाऱ्या कलाकारांनी आता थांबायला पाहिजे. सचिन पिळगांवकरांच्या व्हिडीओवरील कमेंटने हा संदेश दिलाय. स्वप्नील जोशीसाठी या प्रतिक्रिया धोक्याचा इशारा आहे. सचिन पिळगांवकरांचे आजवरचे एकूण रागरंग पाहता त्यांना आपल्याला कोण काय बोलतंय यावर काहीही फरक पडणार नाही. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ हा डायलॉग बहुधा सचिन पिळगांवकरांना बघितल्यावर सेक्रेड गेम्सच्या पटकथाकारांना सुचला असावा अशी माझी ठाम धारणा आहे. जसे स्वत:ला देवाचा अवतार म्हणवणारे भोंदूबाबा असतात तसे हे अभिनयातील भगवान आहेत, असं म्हणणारे भोंदू अभिनेते आहेत असं म्हणायला हरकत नाही. मराठी चित्रपटसृष्टीच्या भल्यासाठी या भोंदू लोकांचा अवतार आता समाप्त होणं आता गरजेचं आहे.

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क