Skip to main content

मराठी चॅनेल्समधील स्थित्यंतर

पुन्हा मराठीच का ?
राष्ट्रीय चॅनलमध्ये गेलेला मराठी पत्रकार पुन्हा मराठीकडे वळला तर हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र गेल्या काही वर्षात बदललेली परिस्थिती पाहता या प्रश्नाचं उत्तर मराठी चॅनल्स ना मिलणारं ग्लॅमर हे उत्तर असू शकतं. माझी सुरवातच मराठी चॅनलपासून झाली, निर्विवादपणे मराठी न्यूज चॅनल्स चा बादशहा म्हणूव ओळखल्या गेलेल्या ईटीव्ही मराठीपासून कारकिर्द सुरू करत असताना नॅशनल हिंदी चॅनल्स ग्लॅमर अनेकांना मी खुणावताना पाहीलं होतं. ही परिस्थिती ख-या अर्थानं बदलली 24 तास बातम्या देणा-या मराठी न्यूज चॅनल्सनी. स्टारमाझा, आय.बी.एन.लोकमत आणि झी24 तास ने ख-या अर्थानं मराठी बातम्या पाहणा-या दर्शकाला वेगळंपण जाणवून देण्याचं काम केलं. मात्र अजूनही मराठी न्यूज चॅनल्स पौगंडावस्थेत आहेत आणि त्यांना करण्यासारखं बरंच काही आहे. मात्र 24 तास बातम्या देणा-या या न्यूज चॅनल्सनी ईटीव्ही न्यूज ची पोकळी कधीच जाणवू दिली नाही.

साधरणपणे 2002 नंतर हिंदी न्यूज चॅनेल्समध्ये सुरू झालेली स्पर्धा ही आता मराठी न्यूज चॅनेल्समध्ये बघायला मिळत आहे.  वेगवान बातम्या, चांगल्या बातम्या तसंच हिंदी चॅनेल्सचा प्रभाव असल्यानं काही प्रमाणात सवंग बातम्याही मराठी न्यूज चॅनेल्सवर पहायला मिळू लागल्या. पण अवघ्या दोन ते तीन वर्षात मराठी न्यूज चॅनेल्स नी त्यांच्या मोठ्या भावंडांना म्हणून नॅशनल न्यूज चॅनेल्सना मागे टाकलं. तेव्हा ही बाब स्पष्ट झाली की महाराष्ट्रमध्ये नॅशनल चॅनेल्स ना त्यांचीच छोटी भावंडं ही धोका ठरायला लागली. एबीपी माझा ने एबीपी न्यूज चा मोठा वर्ग व(प)ळवला, लोकमत ने आयबीएन सेव्हन आणि सीएनएन आयबीएन चा प्रेक्षक वर्ग व(प)ळवला आणि असीच स्थिती झी समूहामध्येही बघायला मिळाली.

मराठीबातम्या बघणारा वर्ग वाढण्यामागे कुठल्या राजकीय पक्षाने केलंलं आंदोलन कारणीभूत नव्हतं, ही गोष्ट यामुळेच शक्य झाली कारण मराठी प्रेक्षक वर्गाची त्याच्याच भाषेत बातम्या बघायला मिळण्याची भूक भागायला लागली. महाराष्ट्रामध्ये राजकारण चेवढ्या चवीनं चर्चिलं जातं तेवढ्य़ाच चवीनं सिनेमा, नाटक, साहित्य यावरही चर्चा झडताना दिसतात. नॅशनल न्यूज चॅनलसाठी नगण्य असणारी उत्तुंग माणसं मराठी माणसाची हिरो होती. ही माणसं मराठी न्यूज चॅनेल्समुळे अजून मोठी झाली, घराघरात पोचली. मराठी न्यूज चॅनलमध्ये येत असलेलं हे स्थित्यंतर अन्य राज्यामध्ये फार आधीच बघायला मिळत होतं, मग ते तमिळनाडू असो, पश्चिम बंगाल असो किंवा गुजरात. या सगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक वाहिन्या जबरदस्त फॉ़र्ममध्ये आहेत.

महाराष्ट्रातील पत्रकार हे प्रतिभावान असून नॅशनल न्यूज चॅनलमध्ये त्यांना फारश्या मोठ्या संधी मिळाल्या नाहीत किंवा जाणूनबुजून दिल्या नाहीत. ज्यांना मिळाल्या त्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्यासारखी आहे. हे पत्रकार मराठी न्यूज चॅनेल्सनी मोठे केले, अनेक प्रिंटमधले पत्रकार ज्यांचा दांडगा अभ्यास असून हिंदी न्यूज चॅनेल्स चर्चेला बोलवत नव्हती, त्यांना मराठी न्यूज चॅनेल्सनी ख-या अर्थानं चेहरा दिला. आता परिस्थिती अशी आली आहे की यातल्या अनेक जणांना हिंदी आणि मराठी पर्याय विचारला तर त्यांचं पहिलं प्राधान्य मराठी न्यूज चॅनेल्स असतात.


जी परिस्थिती किंवा जी तेजी साधारणपणे दहा वर्षांपूर्वी हिंदी किंवा इंग्लिश न्यूज चॅनेल्समध्ये दिसत होती तशीच परिस्थिती आता मराठी न्यूज चॅनेल्समध्ये दिसायला लागली आहे. अपेक्षा हीच आहे की मराठी न्यूज चॅनेल्सचा स्तर असाच उत्तम रहावा. येणा-या काळात अजून मराठी न्यूज चॅनेल्स येतायत त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी न्यूज चॅनेल्समधील स्पर्धा अजून तीव्र होत जाणार. साहजिकच याचा फायदा मराठी पत्रकार, जाणकार आणि  प्रेक्षकांनाच होईल असा परिस्थितीत मराठी पत्रकारांची पावलं पुन्हा मराठी न्यूज चॅनेलकडे वळायला लागली तर त्यावर असं का झालं हा प्रश्न उभा राहणार नाही.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क