Skip to main content

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)


 

नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ब्रुकलीन नाईन नाईनने हा प्रयोग करून बघितलाय.


आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे. 


यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्टेशनमधला तो सुपरस्टार असतो.  त्याची प्रेयसी एमी, मैत्रिण जीना, लेस्बिअन रोझा, खास मित्र चार्ल्स हे सगळे एकत्र कुटुंबाप्रमाणे असतात. 

यातला कोणीतरी प्रचंड गोंधळ घालतात आणि सगळे मिळून निस्तरतात ही सगळ्या भागातील सामाईक गोष्ट आहे. कॅप्टन रेमंड होल्ट हा अख्ख्या पोलीस दलातील पहिला गे कॅप्टन असतो. पोलीस आयुक्त बनण्याचे स्वप्न बनण्याचे स्वप्न बघणारा रेमंड होल्ट अत्यंत कडक शिस्तीचा असतो. या कडक शिस्तीच्या कॅप्टनशी जुळवून घेताना जॅक आणि त्याच्या साथीदारांची तारांबळ उडते. या सगळ्या गोंधळात रेमंड होल्ट थोडा बिघडतो आणि जॅकसह त्याचे साथीदार थोडे सुधारतात. हा सगळा प्रकार ५ सीझनमध्ये आणि १०० पेक्षा जास्त भागांमध्ये दाखवण्यात आला आहे. 

मालिकेचा प्रत्येक भाग हा पुढचा भाग बघण्यासाठी उद्युक्त करणारा आहे. ज्यामुळे प्रेक्षक हा व्यसनी झाल्याप्रमाणे ही मालिका बघत राहतो. प्रेक्षकांनी ही मालिका डोक्यावर उचलून धरल्याने या मालिकेला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत यातील पहिला पुरस्कार हा जॅक पेराल्टाची भूमिका साकारणाऱ्या अँडी सॅमबर्गला  तर दुसरा पुरस्कार सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका या विभागात मिळाला आहे. या मालिकेचे आत्तापर्यंत ५ सीझन आले असून सहावा सीझन केव्हा येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये भयंकर उत्सुकता आहे. सहावा सीझन येण्यापूर्वीच जिना लेनेटीची भूमिका साकारणाऱ्या चेल्सा पेरेटीने आपण या भागात काम करणार नसल्याचं सांगून अनेकांना निराश केलं आहे. ती नसली तरीही पुढच्या भागाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.या पोलीस स्टेशनमध्ये जो काही गोंधळ चालतो तो बघण्यासारखा आहे. त्यामुळे एकदा ही मालिका बघाच.   

Comments

Popular posts from this blog

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क