Skip to main content

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते


भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे. 




मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्ये सांगितलेला आठवत नाही. पाऊस झाल्यानंतर अंदाज यायच की पुढचे ८ तास तास पावसाचा जोर वाढणार, अंदाजाने घाबरून लोकं घरी बसायचे मात्र त्या दिवशी पाऊसच पडायचा नाही. हे तर मी आजपर्यंत कित्येकदा बघितलेलं आहे. असं का होतं याचा गांभीर्याने विचार कोणी का करत नाही हा मला पडलेला स्वाभाविक प्रश्न आहे. 

गेल्या ३-४ वर्षांपासून हवामान खात्याविरूद्ध पोलिसांत तक्रार केल्याच्या बातम्या ऐकायला मिळायला लागल्या आहेत. खरंतर तक्रारींचं हे प्रमाण प्रचंड असायला हवं मात्र देशातील नागरीक बेफिकीर असल्याने तक्रारी होतच नाहीत . का होऊ नयेत तक्रारी? या खात्याने सांगितलेले अंदाज हमखास चुकतात, मोठ्या नैसर्गिक संकटांचे अंदाज वेळेवर मिळतच नाहीत. हे अंदाज न कळाल्याने नागरिकांचा पावसात वीज पडून, खड्ड्यात पडून, नदी नाल्यात बुडून, ड्रेनेजमध्ये बुडून मृत्यू होतो. मग या मृत्यूंसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारं, केंद्र सरकारं यांना जसे जबाबदार धरले जाते तसे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना का धरले जात नाही ?

२०१८ या वर्षासाठी भारतीय हवामान खात्याने अंतिम अंदाज जाहीर करताना म्हटलं होतं की यंदाचा देशभरातील पाऊस हा सरासरीएवढा म्हजेच सामान्य असेल.  पावसाचा संबंध काळ लक्षात घेता देशात ९७ टक्के पाऊस होईल असं हवामान खात्याचं म्हणणं होतं. गेल्या रविवारी हवान खात्याच्या मते पावसाने देशातू गाशा गुंडाळला. तेव्हा पाऊस तब्ल ९.४ टक्के कमी झाल्याचं कळालं होतं. साधारणपणे अंदाज कमी अधिक असण्याचं प्रमाणे  चार टक्के इतकं असतं. मात्र त्यापेक्षा जेव्हा जास्त होतं तेव्हा ती गंभीर चूक असते आणि या वर्षी ही चूक झालेली आहे. सप्टेंबर महिन्यात अंदाजापेक्षा २३ टक्के पाऊस कमी झालाय. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला नाही म्हणून सगळा अंदाज गडबडला असं सांगण्यात येतंय. हवामान खात्याने ऑगस्ट  सप्टेंबरसाठी शेवटचा अंदाज वर्तवला तेव्हा देशात ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला. खासगी हवामान संस्था स्कायमेटने याच सुमरास पाऊस सरासरीपेक्षा कमी होईल असं सांगताना ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात पाऊस झाला ८७ टक्के. स्कायमेट ही खासगी हवामान संस्था सरकारी खात्यापेक्षा या आकड्याच्या अधिक जवळ होती. इतर देशांना अचूक अंदाज मिळतात मग आपल्याला ते का मिळत नाहअसं महटल्यावर हवामान खात्याचे अधिकारी तिथलं वातावरण आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, त्या भौगोलिक परिस्थितीचा त्यांना फायदा होतो असं म्हणत हात झटकतात. असं किती दिवस चालायचं? खासगी संस्थांमध्ये छोट्या चुकांसाठी नोकरीवरून काढून टाकण्यात येतं. इथे देशातील लाखों शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या जीवनमरणाशी निगडीत अंदाज वर्तवायचा असतो, मात्र तो चुकला तर अधिकाऱ्यांना काहीच फरक पडत नाही, त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही.   बहुधा हे देशातील पहिलं आणि एकमेव खातं असं असावं जे सतत चुका करूनही त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही, चुका करूनही हे खातं प्रचंड आनंदात असतं.

Comments

Popular posts from this blog

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...

एका बादलीनं जग बदलेल

                                आत्तापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती ती म्हणजे पाण्याचं संकट हे दरवर्षी मोठं बनत जाणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येतायत, भविष्यातही हे प्रयोग होत राहतील. जलशिवार योजना असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी आपलं नाव अमर व्हावं यासाठी पृथ्वी बंधारे बांधण्याची सुरू केलेली योजना असेल, प्रयत्न सुरू आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर कोणतीही योजना यशस्वी होऊच शकत नाही. मग काय करायचं ?   हातावर हात धरून मांडी घालून पाणी समस्या किती भीषण आहे हो अशी चर्चा करत बसायची ? ज्यांना काहीच करायचं नाही ते काहीच करणार नाही, पण ज्यांना खरोखर काहीतरी करायचंय ते नक्की करू शकतील. वारकरी संप्रदायानं कुटुंब कबिला असणारा-यांना आध्यात्म कळू शकतं, आणि देवापर्यंत पोचता येऊ शकतं हा मार्ग दाखवून दिला. चळवळीच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. काही चळवळ दरवेळी रस्त्यावर उतरून करायला लागते असं नाही, करायची असेल तर ती कशीही करता येते...