Skip to main content

के.सी.आणि मी


कॉलेज संपल्यावर काय करायचं या विवंचनेत असताना माझ्या शाळेतला मित्र जयेश जोशी मुळे मला दिव्यज्ञान प्राप्त झालं की मराठीमध्ये पत्रकारितेचा कोर्स उपलब्ध आहे. क्षणाचाही विलंब न करता मी कोर्स साठी प्रवेश घेऊन टाकला. ख-या अर्थाने कॉलेजचे दिवस मला अनुभवायला मिळाले ते याच काळात. मी आणि जयेशने कॉलेजच्या अधिकृत वेळेचा सदुपयोग मरीन ड्राईव्ह वर टाईमपास करण्यात किंवा प्लॅनेटM” मध्ये गाणी ऐकण्यात घालवलाय. नंतर जयेशचा सिलॅबस संपला आणि तो कॉलेजला फारसा येईनासा झाला. मग माझी लढाई(टाईमपासची) मलाच लढावी लागली. या काळात जरा गांभीर्याने लेक्चरला बसायला लागलो, पण गांभीर्य अगदी काही तासातच ओसरलं आणि त्या अभ्यासाचा कंटाळा येऊ लागला. 

अभ्यासाचा कंटाळा येत असला तरी वर्गामध्ये जरा मजा यायची, आमच्या बॅचला मुलांचं प्रमाण मुलींच्या तुलनेत 30: 3 असं होतं. अभ्यास हा धर्म आहे आणि या धर्माचं प्रत्येकानं पालन केलंच पाहीजे अशी धारणा केलेल्या अनेक मुली वर्गामध्ये होत्या, त्यांच्याकडे बघितलं की उगाच दडपण यायचं. मला आज कॉलेजमध्ये काय शिकलो हे अजिबात आठवत नाहीये, पण या कॉलेजने माझ्यातल्या कवीला नक्की जागं केलं त्याबद्दल कॉलेजला द्यावं तेवढं श्रेय कमीच आहे. (अर्थात माझ्या कविता फक्त मलाच आवडायच्या) सर्वसाधारणपणे मुलं कॉलेजमधून बाहेर पडताना डिग्री नामक कागदाची भेंडोळी घेऊन बाहेर पडतात, मी मात्र काही चांगल्या आठवणी घेऊन कॉलेजमधून बाहेर पडलो. मी वर्गातल्य़ा प्रत्येक बेंचवर बसून बघितलं (काही मंडळी पहिला बेंच सोडायची नाहीत आणि काही शेवटचा) आणि या निष्कर्षापर्यंत पोचलो की ज्याला शिकायचं असतं तो पहिल्या बेंचवर बसूनही शिकतो आणि शेवटच्या बेंचवर बसूनही. 

या ही कोर्समधून मी फार काहीही शिकलो नाही, फक्त मिळालेली डिग्री नोकरी मिळवण्यासाठी शिडी म्हणून उपयुक्त ठरली. काही गोष्टी न ठरवता होतात जर्नालिझमची मिळालेली डिग्री आणि त्यानंतर लागलेली नोकरी हे माझ्यासाठी याचं एक उत्तम उदाहरण ठरलंय. पण या गोष्टी साध्या करण्यामध्ये जयेश आणि बॅचच्या काही सहका-यांचे मला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. 

या बॅचमध्ये माझ्याबरोबर असलेली लोकं आज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, अंतरामुळे आमच्यातला संवाद कमी झाला असला तरी तो कायम टीकून आहे हे विशेष. प्राजक्ता कदम या लोकसत्तेत आहेत, शीतल गवस यांनी नुकतंच जनप्रवाह मासिक सोडून घरी आराम करण्याचा निर्णय घेतलाय, शीतल पालकर या विवेक नावाच्या मासिकामध्ये चांगलं काम करतायत, पर्णिका हेदवकर या दूरदर्शन वरून सगळ्यांना दुरून दर्शन देतायत , योगेश पाटील यांनी पत्रकारिताच सोडून दिली आणि ते सध्या अज्ञातवासात गेलेत. या सगळ्यांना जर्नालिझमच्या बॅचने काही ना काही तरी दिलंय. माझं म्हणायचं झालं तर मला यांच्यासारखे मित्र मैत्रिणी मिळाले आणि जसं मी मगाशी सांगितलं तश्या काही चांगल्या आठवणीही मिळाल्या.

Comments

  1. hahaaahah .....LIAR!! who made u ryt al tis??? SK telme wat kind of fun u had in our clas n wid whom?? ;):p
    vvud luv 2 read...
    dnt tek ma name ..i ll kill u..
    impressed by ur polished rytin skillzz bt felt tat .. if it waz RAW wud hv njoyd more..
    juz one lynn 4 frenz?? ovr?? :/ waz xpectin a bit more.. NeWayzz...
    gudd tat u penned down somthgg.. KIU..ADB!!! :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...