Skip to main content

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

 

मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही.


हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट  खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कदाचित त्या काळामध्ये पृथ्वीवर आलेले अत्यंत ताकदवान परग्रहवासी असू शकतात ज्याला स्वत:च्या शरिराबद्दलही फारसं काही माहिती नव्हतं अशा माणसाला आजच्या काळातील अतिप्रगत मानणाऱ्या मानवालाही शक्य होणार नाहीत अशा गोष्टी करणं कसं काय शक्य झालं ? 


इजिप्तमधले पिरामिड हे त्यातलं एक महत्वाचं उदाहरण म्हणून सांगता येईल. दगडाचे इतके मोठे तुकडे चौकोनी आकारात तेही एक समान आकाराचे कसे काय कापता आले? ते एकावर एक त्रिकोणी आकारात कसे काय ठेवता आले? त्या काळातील मानवाला न शिकवताही त्याने या गोष्टी आत्मसात कशा केल्या ? असे प्रश्न विचारले जातात. इजिप्तमध्ये त्या काळात रेखाटण्यात आलेल्या कलाकृतींमध्ये धड प्राण्याचं आणि शरीर मानवाचं असलेले विचित्र आकार सर्रास बघायला मिळतात. डोक्याभोवती तेजोवलय असलेले आणि या विचित्र प्राण्यापुढे नतमस्तक झालेले त्याकाळचे मानवही रेखाटण्यात आले आहेत. कदाचित ती त्या काळातील देवता असावी मात्र अनेक तर्कवाद्यांच्या मते हा प्राणी परग्रहावासी असावा ज्याच्या अफाट ज्ञानापुढे आणि त्याच्याकडे असलेल्या अतिप्रगत तंत्रज्ञानामुळे सगळे मानव त्यापुढे नतमस्तक झाले असावेत. पिरामिडच्या निर्मितीमध्ये परग्रहवासीयांनीच मदत केली असावी असा दाट संशयही ही तर्कवादी वर्तवतात, अन्यथा एवढं अचूक आणि आखीव रेखीव काम त्या काळच्या माणसाला जमणं अशक्य होतं.इजिप्तमध्येच सिंहाचे शरीर असलेली आणि महिलेचे तोंड असलेली अतिभव्य स्फिंक्सची कलाकृती भर वाळवंटात पाहायला मिळते. गुहांमध्ये ओबडधोबड चित्र काढणाऱ्या त्या काळच्या मानवाला इतकी भव्य कलाकृती उभारण्याची बुद्धीमत्ता होती? हा प्रश्न सतत मनात डोकावत राहतो.

या तर्कवाद्यांच्या यादीमध्ये सुरेश नाडकर्णीदेखील आहेत. त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहलं आहे की इराकमधील मोसूल शहराजवळच्या एका टेकडीवर गुहा सापडली होती. या गुहेमध्ये एक गणित कोरण्यात आलं होतं, गणिताचं उत्तरंही कोरण्यात आलेलं आहे. ते उत्तर होतं १९५,९५५,२००,०००,०००.  कार्बन डेटींगचा वापर करून या गणिताचा काळ हा चाळीस हजार वर्षांपूर्वीचा असावा असं पुस्तकात लिहलं आहे. विचार करा, आजही आपल्याला गणित सोडवायला कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटरचा वापर करावा लागतो, मग त्या काळातील माणसाला हे गणित कसं सोडवता आलं?   

नाईल नदीजवळ अबु सिंबेल या शहराजवळ रॅमिरेज या दुसऱ्या फॅरोने दोन मंदिरे उभारली होती. त्यातील एका मंदिरात ६५ फुटांपेक्षा उंच असे एकूण  दगडी पुतळे उभारले होते. हे त्या काळच्या माणसाला क्रेन, अत्याधुनिक हत्यारे-अवजारे यांच्याशिवाय कसं शक्य झालं असेल? हे पुतळे इतके अजस्त्र आणि वजनी होते की युनेस्कोला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरूनही जागचे हलवता आले नव्हते. अखेर या पुतळ्यांचे चार तुकडे करावे लागले तेव्हा कुठे ते हलवता आले.

नाडकर्णी यांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९३ साली प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर परग्रहवासी पृथ्वीवर आले होते का? आले असतील तर ते परत का गेले ? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा बराच प्रयत्न झाला आहे. त्यांचं संशोधन ऐकताना, वाचताना मती गुंग होत राहते. पुराणामध्ये सातत्याने येणारा विमानाचा उल्लेख, रामायण, महाभारतामध्ये अण्वस्त्रासारखी वर्णन असली अतिसंहारक अस्त्रे,हनुमानाला उडता येणे या गोष्टी पुन्हा विचार करून ताडून पहाव्याश्या वाटतात. तर्कवाद्यांनी तर्क मांडत त्यांचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केल्याने ही अंधश्रद्धा नाही हे तर स्पष्ट आहे. मग तर्काच्या कसोटीवर आपले देव हे देखील परग्रहवासी असतील का असा विचार डोक्यात येतो आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही खरंच सृष्टीनियंते आहात की परग्रहवासी असा प्रश्न पडत रहातो.

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क