Skip to main content

के.सी.आणि मी


कॉलेज संपल्यावर काय करायचं या विवंचनेत असताना माझ्या शाळेतला मित्र जयेश जोशी मुळे मला दिव्यज्ञान प्राप्त झालं की मराठीमध्ये पत्रकारितेचा कोर्स उपलब्ध आहे. क्षणाचाही विलंब न करता मी कोर्स साठी प्रवेश घेऊन टाकला. ख-या अर्थाने कॉलेजचे दिवस मला अनुभवायला मिळाले ते याच काळात. मी आणि जयेशने कॉलेजच्या अधिकृत वेळेचा सदुपयोग मरीन ड्राईव्ह वर टाईमपास करण्यात किंवा प्लॅनेटM” मध्ये गाणी ऐकण्यात घालवलाय. नंतर जयेशचा सिलॅबस संपला आणि तो कॉलेजला फारसा येईनासा झाला. मग माझी लढाई(टाईमपासची) मलाच लढावी लागली. या काळात जरा गांभीर्याने लेक्चरला बसायला लागलो, पण गांभीर्य अगदी काही तासातच ओसरलं आणि त्या अभ्यासाचा कंटाळा येऊ लागला. 

अभ्यासाचा कंटाळा येत असला तरी वर्गामध्ये जरा मजा यायची, आमच्या बॅचला मुलांचं प्रमाण मुलींच्या तुलनेत 30: 3 असं होतं. अभ्यास हा धर्म आहे आणि या धर्माचं प्रत्येकानं पालन केलंच पाहीजे अशी धारणा केलेल्या अनेक मुली वर्गामध्ये होत्या, त्यांच्याकडे बघितलं की उगाच दडपण यायचं. मला आज कॉलेजमध्ये काय शिकलो हे अजिबात आठवत नाहीये, पण या कॉलेजने माझ्यातल्या कवीला नक्की जागं केलं त्याबद्दल कॉलेजला द्यावं तेवढं श्रेय कमीच आहे. (अर्थात माझ्या कविता फक्त मलाच आवडायच्या) सर्वसाधारणपणे मुलं कॉलेजमधून बाहेर पडताना डिग्री नामक कागदाची भेंडोळी घेऊन बाहेर पडतात, मी मात्र काही चांगल्या आठवणी घेऊन कॉलेजमधून बाहेर पडलो. मी वर्गातल्य़ा प्रत्येक बेंचवर बसून बघितलं (काही मंडळी पहिला बेंच सोडायची नाहीत आणि काही शेवटचा) आणि या निष्कर्षापर्यंत पोचलो की ज्याला शिकायचं असतं तो पहिल्या बेंचवर बसूनही शिकतो आणि शेवटच्या बेंचवर बसूनही. 

या ही कोर्समधून मी फार काहीही शिकलो नाही, फक्त मिळालेली डिग्री नोकरी मिळवण्यासाठी शिडी म्हणून उपयुक्त ठरली. काही गोष्टी न ठरवता होतात जर्नालिझमची मिळालेली डिग्री आणि त्यानंतर लागलेली नोकरी हे माझ्यासाठी याचं एक उत्तम उदाहरण ठरलंय. पण या गोष्टी साध्या करण्यामध्ये जयेश आणि बॅचच्या काही सहका-यांचे मला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. 

या बॅचमध्ये माझ्याबरोबर असलेली लोकं आज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, अंतरामुळे आमच्यातला संवाद कमी झाला असला तरी तो कायम टीकून आहे हे विशेष. प्राजक्ता कदम या लोकसत्तेत आहेत, शीतल गवस यांनी नुकतंच जनप्रवाह मासिक सोडून घरी आराम करण्याचा निर्णय घेतलाय, शीतल पालकर या विवेक नावाच्या मासिकामध्ये चांगलं काम करतायत, पर्णिका हेदवकर या दूरदर्शन वरून सगळ्यांना दुरून दर्शन देतायत , योगेश पाटील यांनी पत्रकारिताच सोडून दिली आणि ते सध्या अज्ञातवासात गेलेत. या सगळ्यांना जर्नालिझमच्या बॅचने काही ना काही तरी दिलंय. माझं म्हणायचं झालं तर मला यांच्यासारखे मित्र मैत्रिणी मिळाले आणि जसं मी मगाशी सांगितलं तश्या काही चांगल्या आठवणीही मिळाल्या.

Comments

  1. hahaaahah .....LIAR!! who made u ryt al tis??? SK telme wat kind of fun u had in our clas n wid whom?? ;):p
    vvud luv 2 read...
    dnt tek ma name ..i ll kill u..
    impressed by ur polished rytin skillzz bt felt tat .. if it waz RAW wud hv njoyd more..
    juz one lynn 4 frenz?? ovr?? :/ waz xpectin a bit more.. NeWayzz...
    gudd tat u penned down somthgg.. KIU..ADB!!! :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क