Skip to main content

ईटीव्ही नावाचा मॅरेज ब्युरो.

ईटीव्हीत असताना अनेक अनुभव आले...चांगले कमी आणि वाईट जास्त होते. सगळ्यात महत्वाचं तत्व जे मी ईटीव्हीतून किंवा आत्तापर्यंतच्या अनुभवातून शिकलो ते म्हणजे काहीच निश्चित आणि शाश्वत नसतं, आज एखादा माणूस वर दिसतो तो दुस-या दिवशी असा खाली आपटेल की कोणी विचारही करू शकत नाही. त्यामुळे झटपट वर जाण्याच्या नादात लोकांकडून फक्त शिव्याशाप खाणारे अनेकजण मी जवळून बघितलेत ( सोप्या समजणा-या भाषेत यांना चाटुकारिता करणारे म्हणतात) आपली मतं दुस-याला पटली नाहीत तर ती दुस-यावर लादण्यापेक्षा शांत बसावं हे मी या काळातच शिकलो....

ईटीव्हीला मिनी भारत म्हटलं जायचं...संपूर्ण भारतातून इथे लोकं काम करत होते, हैद्राबादमध्ये रहात होते. भारताप्रमाणेच इथंही लोकांमध्ये एकोपा होता, भांडणं होती, आणि कंपूगिरीही होती. प्रत्येकाने आपापला गट बनवला होता तसा तो माझाही होता. मी ,सचिन फुलपगारे , आशिष चांदोरकर, अमित जोशी आणि सचिन देशपांडे एका घरात रहायचो, पण भांडणंही जबरदस्त व्हायची...अमित जोशी पातेलंभर चहा करायचा (अमितसमोर हा विषय काढला तर तो अजूनही वैतागतो) कुकरभर खिचडी करायचा आणि नंतर सगळं एकतर स्वतच खायचा किंवा फेकून द्यायचा. ज्यामुळे सगळे त्याच्यावर वैतागायचे. सचिन देशपांडे लवकर चिडायचा,त्यामुळे त्याचे आणि इतरांचे बरेचदा खटके उडायचे, आशिष चांदोरकर कधीच भांडायचा नाही पण लोकांना त्रास द्याची त्याची स्टाईल वेगळी होती. नीरव शांततेत, वाघाने डरकाळी फोडावी तसा आशिष घोरायचा...त्याला झोपेतून उठवलं आणि सांगितलं की घोरू नको तर वैतागायचा...बाईकचा फाटलेल्या सायलेंसर असेल तर तो कसा आवाज करेल सेम त्याच आवाजात घोरण्याची आशिषची खासियत होती. सुरवातीला त्रास झाला पण नंतर सवय झाली. मी आणि सचिन अनेकदा घरी नसायचो, आमच्या घरापेक्षा आम्ही शिरीश, दिपक आणि कोंपलवाराच्या बंगल्यावर पडलेलो असायचो, त्यामुळे घरातले अनेकदा वैतागायचे. नंतर एकमेकांना सगळ्यांचीच सवय झाली. सगळं सहन करायची आमची तयारी होती फक्त हातात पैसे नव्हते. ज्या पद्धतीने आम्ही घरखर्चाचं प्लॅनिंग करायचो ते बघण्यासारखं असायचं. बजेट लिहताना एकेका रूपयाचा हिशोब ठेवण्याच्या नादात भांडणं सुद्धा झालेली आहेत.

हे दिवस आयुष्यातले अत्यंत महत्वाचं आणि कसं जगायचं याचं कोचिंग देणारे दिवस होते. या कोचिंगसाठी ना कोणी गाईड होतं, आणि ना कोणता सिलॅबस...प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं शोधायचा, एक मित्र होता, ज्याचा प्रेमभंग झाल्याने गच्चीवर रडत बसला होता, त्याच्याकडे बघून मी मनातून घाबरलो होतो, मी मनात म्हणतच होतो हे सीन फक्त पिक्चरमध्ये पाहीलेत, रियल लाईफमध्ये हे पहिल्यांदाच बघत होतो. नंतर तो भाई पुन्हा लाईनीवर आला आणि आता जीवनात सॉलिड सुखी आहे. या संस्थेनं कोणाला पदं दिली, कोणाला मनस्ताप दिला, प्रत्येकाला काहीना काही तरी दिलं, काहींच्या पदरात चांगल्या गोष्टी पडल्या तर काहींच्या वाईट. मात्र काही लोकं अशी होती, ज्यांना आयुष्यभर लक्षात राहील अशी गोष्ट या संस्थेनं दिली ती म्हणजे सावलीप्रमाणे बरोबर फिरणारा नवरा किंवा बायको....

शिरीश जाधव-भाग्यश्री

दिपक शितोळे-अनुपमा,

सचिन जोशी-केतकी

ही काही मला माहिती असलेली उदाहरणं आहेत. माझ्या आधी आणि नंतर अनेक जणांना या संस्थेनं जीनवसाथी दिले. माझ्या आधीही या संस्थेमध्ये सूर जुळले आजही जुळत असतील आणि कदाचित नंतरही जुळत राहतील. म्हणून ईटीव्हीला गंमतीनं काही लोकं मॅरेज ब्युरोसुद्धा म्हणायचे...

Comments

  1. ई टीव्ही ची अशीही ओळख मांडल्या बद्दल तुला धन्यवाद...(तुला आता आमच्यातर्फे अनलिमिटेड चहा..कधीपण ये)
    अनेक सूर अजूनही जुळत आहेत.......गोपनीयतेच्या कायद्यामुळे नावं इथे देत नाही....

    ReplyDelete
  2. छान लिहिलय तुम्ही. आवडलं मला. Keep it up.
    - मुकुंद टाकसाळे

    ReplyDelete
  3. kukarbhar Khichadi ani char lok.....me khup chidto ?. thik aahe.

    ReplyDelete
  4. ईटिव्हीतले शिरीन फरहाद म्हणजे शिरीष आणि भाग्यश्री. त्यांच्याबरोबरच हीर रांझा (सचिन केतकी) आणि सोनी महिवालच्या (दीपक अनुपमा) यांच्या आठवणींनाही तू उजाळा दिलास. त्याबद्दल सचिन, दीपक आणि शिरीषकडून तुला एक पार्टी लागू..आणि या तीनही जोड्यांना योग्य नावं सुचवल्याबददल मलाही.

    सागर गोखले

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...