Skip to main content

ईटीव्ही नावाचा मॅरेज ब्युरो.

ईटीव्हीत असताना अनेक अनुभव आले...चांगले कमी आणि वाईट जास्त होते. सगळ्यात महत्वाचं तत्व जे मी ईटीव्हीतून किंवा आत्तापर्यंतच्या अनुभवातून शिकलो ते म्हणजे काहीच निश्चित आणि शाश्वत नसतं, आज एखादा माणूस वर दिसतो तो दुस-या दिवशी असा खाली आपटेल की कोणी विचारही करू शकत नाही. त्यामुळे झटपट वर जाण्याच्या नादात लोकांकडून फक्त शिव्याशाप खाणारे अनेकजण मी जवळून बघितलेत ( सोप्या समजणा-या भाषेत यांना चाटुकारिता करणारे म्हणतात) आपली मतं दुस-याला पटली नाहीत तर ती दुस-यावर लादण्यापेक्षा शांत बसावं हे मी या काळातच शिकलो....

ईटीव्हीला मिनी भारत म्हटलं जायचं...संपूर्ण भारतातून इथे लोकं काम करत होते, हैद्राबादमध्ये रहात होते. भारताप्रमाणेच इथंही लोकांमध्ये एकोपा होता, भांडणं होती, आणि कंपूगिरीही होती. प्रत्येकाने आपापला गट बनवला होता तसा तो माझाही होता. मी ,सचिन फुलपगारे , आशिष चांदोरकर, अमित जोशी आणि सचिन देशपांडे एका घरात रहायचो, पण भांडणंही जबरदस्त व्हायची...अमित जोशी पातेलंभर चहा करायचा (अमितसमोर हा विषय काढला तर तो अजूनही वैतागतो) कुकरभर खिचडी करायचा आणि नंतर सगळं एकतर स्वतच खायचा किंवा फेकून द्यायचा. ज्यामुळे सगळे त्याच्यावर वैतागायचे. सचिन देशपांडे लवकर चिडायचा,त्यामुळे त्याचे आणि इतरांचे बरेचदा खटके उडायचे, आशिष चांदोरकर कधीच भांडायचा नाही पण लोकांना त्रास द्याची त्याची स्टाईल वेगळी होती. नीरव शांततेत, वाघाने डरकाळी फोडावी तसा आशिष घोरायचा...त्याला झोपेतून उठवलं आणि सांगितलं की घोरू नको तर वैतागायचा...बाईकचा फाटलेल्या सायलेंसर असेल तर तो कसा आवाज करेल सेम त्याच आवाजात घोरण्याची आशिषची खासियत होती. सुरवातीला त्रास झाला पण नंतर सवय झाली. मी आणि सचिन अनेकदा घरी नसायचो, आमच्या घरापेक्षा आम्ही शिरीश, दिपक आणि कोंपलवाराच्या बंगल्यावर पडलेलो असायचो, त्यामुळे घरातले अनेकदा वैतागायचे. नंतर एकमेकांना सगळ्यांचीच सवय झाली. सगळं सहन करायची आमची तयारी होती फक्त हातात पैसे नव्हते. ज्या पद्धतीने आम्ही घरखर्चाचं प्लॅनिंग करायचो ते बघण्यासारखं असायचं. बजेट लिहताना एकेका रूपयाचा हिशोब ठेवण्याच्या नादात भांडणं सुद्धा झालेली आहेत.

हे दिवस आयुष्यातले अत्यंत महत्वाचं आणि कसं जगायचं याचं कोचिंग देणारे दिवस होते. या कोचिंगसाठी ना कोणी गाईड होतं, आणि ना कोणता सिलॅबस...प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं शोधायचा, एक मित्र होता, ज्याचा प्रेमभंग झाल्याने गच्चीवर रडत बसला होता, त्याच्याकडे बघून मी मनातून घाबरलो होतो, मी मनात म्हणतच होतो हे सीन फक्त पिक्चरमध्ये पाहीलेत, रियल लाईफमध्ये हे पहिल्यांदाच बघत होतो. नंतर तो भाई पुन्हा लाईनीवर आला आणि आता जीवनात सॉलिड सुखी आहे. या संस्थेनं कोणाला पदं दिली, कोणाला मनस्ताप दिला, प्रत्येकाला काहीना काही तरी दिलं, काहींच्या पदरात चांगल्या गोष्टी पडल्या तर काहींच्या वाईट. मात्र काही लोकं अशी होती, ज्यांना आयुष्यभर लक्षात राहील अशी गोष्ट या संस्थेनं दिली ती म्हणजे सावलीप्रमाणे बरोबर फिरणारा नवरा किंवा बायको....

शिरीश जाधव-भाग्यश्री

दिपक शितोळे-अनुपमा,

सचिन जोशी-केतकी

ही काही मला माहिती असलेली उदाहरणं आहेत. माझ्या आधी आणि नंतर अनेक जणांना या संस्थेनं जीनवसाथी दिले. माझ्या आधीही या संस्थेमध्ये सूर जुळले आजही जुळत असतील आणि कदाचित नंतरही जुळत राहतील. म्हणून ईटीव्हीला गंमतीनं काही लोकं मॅरेज ब्युरोसुद्धा म्हणायचे...

Comments

  1. ई टीव्ही ची अशीही ओळख मांडल्या बद्दल तुला धन्यवाद...(तुला आता आमच्यातर्फे अनलिमिटेड चहा..कधीपण ये)
    अनेक सूर अजूनही जुळत आहेत.......गोपनीयतेच्या कायद्यामुळे नावं इथे देत नाही....

    ReplyDelete
  2. छान लिहिलय तुम्ही. आवडलं मला. Keep it up.
    - मुकुंद टाकसाळे

    ReplyDelete
  3. kukarbhar Khichadi ani char lok.....me khup chidto ?. thik aahe.

    ReplyDelete
  4. ईटिव्हीतले शिरीन फरहाद म्हणजे शिरीष आणि भाग्यश्री. त्यांच्याबरोबरच हीर रांझा (सचिन केतकी) आणि सोनी महिवालच्या (दीपक अनुपमा) यांच्या आठवणींनाही तू उजाळा दिलास. त्याबद्दल सचिन, दीपक आणि शिरीषकडून तुला एक पार्टी लागू..आणि या तीनही जोड्यांना योग्य नावं सुचवल्याबददल मलाही.

    सागर गोखले

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क