Skip to main content

मित्र

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवनवी माणसं भेटत असतात, कोणी इतकी डोक्यात जातात की त्यांचं तोंडही बघू नये असं वाटतं पण काही माणसं ही पहिल्याच भेटीत इतकी जवळची वाटतात की त्यांच्याशी पटकन वेव्हलेंग्थ जुळते. माझे अनेक मित्र असे आहेत ज्यांच्याशी पहिल्याच भेटीत मस्त दोस्ती झाली. हा ब्लॉग त्या सगळ्या मित्रांसाठी आहे ज्यांनी ब-या वाईट दिवसांमध्ये मला साथ दिली, आणि जगण्याच्या प्रत्येक क्षणाला वेगळेपण दिलं.

सुरवात शाळेपासून डोंबिवलीची स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळा मध्यमवर्गीयांच्या मुलांची शाळा म्हणून ओळखली जायची. त्यातली गोपाळनगर शाखा काहीशी अडगळीतलीच शाखा होती. शाळेच्या दिवसांमध्ये अनेक मुलं सोबत होती, पण त्यातल्या फार कमी जणांशी मित्रत्वाचं नातं जोडलं गेलं.आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॉलेज पूर्ण होऊन नोकरीला लागल्यावर यातली अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी दिसायची पण इतक्या वर्षांनी एकमेकाकडे बघितल्यावर ओळख नसल्याप्रमाणे सगळे तोंड फिरवायचे...संवाद नसणं हे यातलं एकमेव कारण होते. मात्र काही दिवसांनी हे चित्र बदललं आणि एका गेट-टुगेदरच्या निमित्ताने बरीच मंडळी एकत्र आली आणि अनेकांशी असलेला दुरावा ब-याच प्रमाणात दूर झाला. आज शाळेतले आमच्या बॅचमधली अनेक जणं अशी आहेत ज्यांच्याशी शाळेत असताना कधी नव्हता एवढी जवळीक आताशी निर्माण झालीय.

लहानपणी कॉलनीमधील जवळचे वाटणारे मित्र आता कधी एक साधा कॉलही करत नाहीत आणि कालपरवा भेटलेले मित्र एवढे जवळचे झालेत की घरचा हिस्सा बनून गेलेत. नाती बदलत असतात तसं मित्रत्वाच्या परीभाषा आणि मित्रही बदलत जातात. काही जुने मित्र कायम राहतात, काही जुने मित्र विस्मरणात जातात किंवा त्यांच्यासाठी तुमचं महत्व कमी होतं आणि नंतर ते संबंधच तोडून टाकतात. सुदैवानं आजही लहानपणीचे कॉलनीतले काहीच मित्र मैत्री टिकवून आहेत, त्यांना खास धन्यवादच द्यावे लागतील.

नोकरीची सुरवात ईटीव्हीपासून झाली, घरापासून दूर राहताना (हैद्राबादला) घरच्यांची जाणवणारी उणीव ही मित्रांनीच भरून काढली होती। घरातले माझ्याबरोबर

राहणारे, ऑफीसमध्ये काम करणारे असे अनेक मित्र या काळात जोडले गेले। घरापासून आयुष्यात पहिल्यांदाच दूर राहत असल्याने ख-या अर्थाने मित्र असणं का गरजेचं आहे याची जाणीव झाली. आणि ती त्यानंतर अधिक अधिक वाढतच गेली।

कामाच्या निमित्ताने आजवर मी तीन संस्था बदलल्या (खरं तर दोन संस्था बदलल्या कारण एका संस्थेत मी अवघा दिड महिनाच काढला) या संस्थांनी आणि कामाने मला असंख्य मित्र आणि मिळाले अनेक मैत्रिणीही जोडल्या ( विशेष म्हणजे यातल्या अनेक जणी माझ्यापेक्षा दिप्तीच्या जास्त जवळच्या आहेत) माझ्या क्षेत्रातलीच नाही तर क्षेत्राबाहेरचीही अनेक दोस्त मंडळी जमवली. यातल्या अनेकांशी दोस्ती ही भंकसपुरता आहे, काहींशी फक्त तात्विक चर्चेसाठी, तर काहींशी मैत्री कशी झाली याचं उत्तर मला आजही सापडलेलं नाही. खरं तर या ब्लॉगमध्ये प्रत्येक मित्राचा उल्लेख करायचा होता पण असं झालं असतं तर एखाद्याचं नाव वगळलं गेलं असतं तर ते मलाच बरोबर वाटलं नसतं. प्रपंचात अडकल्याने कामाच्या भयानक वेळांमुळे, काहींनी हे शहर सोडल्याने अनेक मित्र आधीसारखे भेटत नाही. पण त्यामुळे मैत्रीत काही खंड पडला असं कधीही झालेलं नाही.

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. एकदम झक्कास लिहिलं आहे मित्रा

    ReplyDelete
  3. झक्कास!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...