Skip to main content

मित्र

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवनवी माणसं भेटत असतात, कोणी इतकी डोक्यात जातात की त्यांचं तोंडही बघू नये असं वाटतं पण काही माणसं ही पहिल्याच भेटीत इतकी जवळची वाटतात की त्यांच्याशी पटकन वेव्हलेंग्थ जुळते. माझे अनेक मित्र असे आहेत ज्यांच्याशी पहिल्याच भेटीत मस्त दोस्ती झाली. हा ब्लॉग त्या सगळ्या मित्रांसाठी आहे ज्यांनी ब-या वाईट दिवसांमध्ये मला साथ दिली, आणि जगण्याच्या प्रत्येक क्षणाला वेगळेपण दिलं.

सुरवात शाळेपासून डोंबिवलीची स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळा मध्यमवर्गीयांच्या मुलांची शाळा म्हणून ओळखली जायची. त्यातली गोपाळनगर शाखा काहीशी अडगळीतलीच शाखा होती. शाळेच्या दिवसांमध्ये अनेक मुलं सोबत होती, पण त्यातल्या फार कमी जणांशी मित्रत्वाचं नातं जोडलं गेलं.आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॉलेज पूर्ण होऊन नोकरीला लागल्यावर यातली अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी दिसायची पण इतक्या वर्षांनी एकमेकाकडे बघितल्यावर ओळख नसल्याप्रमाणे सगळे तोंड फिरवायचे...संवाद नसणं हे यातलं एकमेव कारण होते. मात्र काही दिवसांनी हे चित्र बदललं आणि एका गेट-टुगेदरच्या निमित्ताने बरीच मंडळी एकत्र आली आणि अनेकांशी असलेला दुरावा ब-याच प्रमाणात दूर झाला. आज शाळेतले आमच्या बॅचमधली अनेक जणं अशी आहेत ज्यांच्याशी शाळेत असताना कधी नव्हता एवढी जवळीक आताशी निर्माण झालीय.

लहानपणी कॉलनीमधील जवळचे वाटणारे मित्र आता कधी एक साधा कॉलही करत नाहीत आणि कालपरवा भेटलेले मित्र एवढे जवळचे झालेत की घरचा हिस्सा बनून गेलेत. नाती बदलत असतात तसं मित्रत्वाच्या परीभाषा आणि मित्रही बदलत जातात. काही जुने मित्र कायम राहतात, काही जुने मित्र विस्मरणात जातात किंवा त्यांच्यासाठी तुमचं महत्व कमी होतं आणि नंतर ते संबंधच तोडून टाकतात. सुदैवानं आजही लहानपणीचे कॉलनीतले काहीच मित्र मैत्री टिकवून आहेत, त्यांना खास धन्यवादच द्यावे लागतील.

नोकरीची सुरवात ईटीव्हीपासून झाली, घरापासून दूर राहताना (हैद्राबादला) घरच्यांची जाणवणारी उणीव ही मित्रांनीच भरून काढली होती। घरातले माझ्याबरोबर

राहणारे, ऑफीसमध्ये काम करणारे असे अनेक मित्र या काळात जोडले गेले। घरापासून आयुष्यात पहिल्यांदाच दूर राहत असल्याने ख-या अर्थाने मित्र असणं का गरजेचं आहे याची जाणीव झाली. आणि ती त्यानंतर अधिक अधिक वाढतच गेली।

कामाच्या निमित्ताने आजवर मी तीन संस्था बदलल्या (खरं तर दोन संस्था बदलल्या कारण एका संस्थेत मी अवघा दिड महिनाच काढला) या संस्थांनी आणि कामाने मला असंख्य मित्र आणि मिळाले अनेक मैत्रिणीही जोडल्या ( विशेष म्हणजे यातल्या अनेक जणी माझ्यापेक्षा दिप्तीच्या जास्त जवळच्या आहेत) माझ्या क्षेत्रातलीच नाही तर क्षेत्राबाहेरचीही अनेक दोस्त मंडळी जमवली. यातल्या अनेकांशी दोस्ती ही भंकसपुरता आहे, काहींशी फक्त तात्विक चर्चेसाठी, तर काहींशी मैत्री कशी झाली याचं उत्तर मला आजही सापडलेलं नाही. खरं तर या ब्लॉगमध्ये प्रत्येक मित्राचा उल्लेख करायचा होता पण असं झालं असतं तर एखाद्याचं नाव वगळलं गेलं असतं तर ते मलाच बरोबर वाटलं नसतं. प्रपंचात अडकल्याने कामाच्या भयानक वेळांमुळे, काहींनी हे शहर सोडल्याने अनेक मित्र आधीसारखे भेटत नाही. पण त्यामुळे मैत्रीत काही खंड पडला असं कधीही झालेलं नाही.

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. एकदम झक्कास लिहिलं आहे मित्रा

    ReplyDelete
  3. झक्कास!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क