Skip to main content

पिकली देठं जाऊ द्या सुकली पानं बघा

भाजपाचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालपरवा एक विधान केलं, ज्यात ते म्हाणाले की मी पण त्या "क्लिप्स" बघतो. त्यावर आलेल्या निषेधाच्या प्रतिक्रियांमध्ये शिवसेनेच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांचाही समावेश होता. मात्र त्यांच्या पक्षानं सध्या पिकल्या देठाचा नाही तर सुकल्या पानांचा विचार करणं अधिक गरजेचं आहे. याचा अर्थ साधा आहे, राज्यात दुष्काळ पडलाय त्याकडे शिवसेनेनं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अर्थात नीलम गोऱ्हे यांना मिडीया अटेंन्शन हवं असेल तर भाग वेगळा.




उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला, सुरूवातील मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे उस्मानाबादपासून दौरा सुरू करणार होते. मात्र असं बोललं जातं की तिथे जाण्यासाठी त्यांना खाजगी विमान मिळालं नाही. उस्मानाबादला गाडीनं जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र गाडीचा प्रवास नको म्हणून त्यांनी उस्मानाबादचा दौराच रद्द करून टाकला. अर्थात उद्धव ठाकरेंची सर्जरी झालेली आहे, त्यांना प्रवास झेपत नाही, मग असं असेल तर मग उस्मानाबादचं किंवा औरंगाबादचं प्रयोजन ठेवलंच कशाला असा प्रश्न पडू शकतो. शिवसेनेचे बहुतांश कार्यक्रम मातोश्री किंवा शिवसेना भवनात होतात, तिथेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बोलावून मदत देता आली असती. 


अभिनेता मरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर दोघेजण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुुटुंबियांना मदत देण्याचं काम करतायत. तर दुसरीकडे सरकार देखील दुष्काळाशी लढण्याचा प्रयत्न करत आहे.  सरकारकडे अनेकजण मदतीचे धनादेश सुपूर्द करतायत. तर ज्यांना हा मार्ग अवलंबायचा नाही ते नाना आणि मकरंद यांच्याकडे मदतीचा धनादेश सोपवतायत. मग शिवसेना वेगळी जाऊन मदत का करतेय या प्रश्नाचं उत्तर मिळेनासं झालंय. शिवसेनेला शेतकऱ्यांना मदतच करायी होती तर मग त्यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे का दिला नाही ? उद्धव ठाकरेंचा ते ज्या सत्तेचा भाग आहेत त्या सरकारवर भरोसा नाही का ?


उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनाच दुष्काळाचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला. राजकारणात असे आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. पण मग उद्धव ठाकरे वेगळं असं काय करतायत ? भाजपानं
आपल्याला दूर ढकललं किंवा आपणच भाजपाला हाकलून दिलं असं दाखवायचं असेल तर मग आपली व्होटबँक तयार व्हायला नको का ? या चिंतेने  पछाडलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्वत:च मराठवाड्यात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ते औरंगाबाद पलिकडे मराठवाड्यात फिरकलेच नाहीत. 

उद्धव ठाकरे जर उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर ते मातोश्रीवर बसून किंवा सेना भवनात बसूनच राज्याचा
कारभार हाकणार आहेत का ? तब्येत बरी नसली तर ते राज्याच्या विविध भागांचे दौरे करणार नाहीत का ? असे  प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे  'राजकारण करू नका'  असा सल्ला देणाऱ्या उद्धव ठाकरेंनीही या मुद्दाचं राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत करावी हे अपेक्षित आहे. 

Comments

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...