Skip to main content

चमडी डॉट कॉम...

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीची ज्ञात लग्न अज्ञात लफडी यामुळे ती बातमी अनेकांनी फार चवीनं दाखवली. हा सगळा प्रकार होता त्याला बोली भाषेत चमडीगिरी म्हणतात,  या चमडीगिरीमध्ये अडकलेल्या अनेकांचे हाल आज इंद्राणीच्या आजी माजी पती, तिच्यावर प्रेम करणा-यांचे झालेत तसेच होतात.
बातम्या करताना अनेक लोकांशी संबंध येतो त्यावेळी बोलत असताना हा शब्द हमखास ऐकायला मिळतो, भाई तो एक नंबरचा चमडी आहे हां..अनेकदा राजकारणी, अधिकारी वकील, पत्रकार, डॉक्टर  हे देखील या चमडीगिरीत अडकलेले बघायला मिळतात. 


यातले अनेक जण सुरूवातीला वासू असतात, वास काढत फिरत असतात. एखादी सुंदर महिला दिसली की यांचं काम सुरू होतं. तिला फिरवण्यासाठी ते काय पण करायला तयार असतात, अर्थात याला वयोमर्यादा अजिबात नसते, 60 वर्ष पूर्ण केलेले म्हातारे पण तरूण पोरींना, महिलांना घेऊन फिरताना बघायला मिळतात.  या सगळ्यांचा शेवट हा एकतर त्या महिलेच्या हातून मार खाण्यात होतो, एखाद्या लफड्यात अडकण्यात होतो, किंवा बायकोच्या हातचा सगळ्यांच्या समोर मार खाण्यात होतो. 

हे चित्र प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आलेलं आहे

तरीही यातल्या काहींची हौस फार दांडगी असते. मार खाल्ला, लफडी झाली तरी हे चमडी पब्लिक गरजू महिलेला खांदा द्यायला तयारच असतात. तनू वेडस मनू-2 मध्ये जिम्मी शेरगिल त्यातल्याच एका कॅरेक्क्टरला प्रश्न विचारतो "तू कौन, (तो समोरचा उत्तर देतो ) भैय्या हम कंधा...आपने छोड दिया तो डॉक्टरसाब ने दे दिया, उन्होने छोडा तो हमने दे दिया, हम छोड देंगे ता आप दे देना" असे अनेक खांदे आपल्या आजूबाजूला सतत फिरत असतात.  

याचा फायदा काही महिला घेतात आणि स्वत:चा स्वार्थ साधतात. महिला ऑफिसमधलीच असेल तर अशावेळी अनेकदा पुरूष कर्मचा-यांवर प्रचंड अन्याय झालेला बघायला मिळतो, पण बोलायचं कोणाकडे ? बॉसकडे गेलो तर तो बॉस स्वत: खांदा देणारा असतो, किंवा खांदा देणारा बॉसचा गोटी तरी असतो. इथे हक्क-बिक्क मागून काही चालत नाही, असं काही झालं तर ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढलं जाण्याची शक्यता असते. 

काही प्रकरणं कानावर येतात, त्यातलं एक प्रकरण असं आहे की एका सदगृहस्थाचं लग्न झालेलं होतं. तरीही त्यांना एक मुलगी आवडायला लागली. ते तिच्याबरोबर व्यवस्थित फिरायला वैगरे लागले.  मग कामानिमित्त टूर्स पण व्हायला लागल्या, काही दिवसांनी भाऊ घरी कमी आणि टूर्सवरच जास्त दिसायला लागले. बायकोला कळालं की आपला नवरा असले धंदे करतोय.त्याला धडा कसा शिकवायचा असा विचार करत असताना त्या बायकोलाही खांदा मिळाला, मग काय आनंदी आनंद झाला.  आज हे दोघेही नवरा-बायको आपलं नातं नावापुरता टीकवून आहेत, कारण समाजात हे नातं टिकवणं गरजेचं असतं.


हे चित्र प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आलेलं आहे
दुस-या एका प्रसंगात पन्नाशी गाठलेल्या एका खांद्यानं फेसबुकवर 34 वर्षांच्या (तरूणी म्हणावं का महिला हा प्रश्न आहे) एका तरूणीला आधार दिला. तरूणीला माहितीच नव्हतं की हा भाऊ लग्न झालेला आहे, त्याला दोन मुलं आहेत. एकेदिवशी खांद्याच्या बायकोला कळालं की आपला नवरा कोणाबरोबर तरी चॅटींग करतोय. बायकोनं गपचूप पद्धतीनं नवऱ्याच्या अकाऊंटवरून त्या तरूणीला एके ठिकाणी भेटायला बोलावलं. ज्या मॉलमध्ये भेटायला बोलावलं त्या मॉलमधल्या लोकांना दोन महिलांची फ्रीस्टाईल कुस्ती बघायला मिळाली. त्या नवऱ्याचं घरी काय झालं असेल कोणास ठाऊक.

असे अनेक प्रसंग आहे जे बघितलेले आहेत, माहिती आहेत. शीना बोरा प्रकरणातील इंद्राणीनं देखील असे बरेचसे खांदे शोधले असतील त्यातून जी गुंतागुंत निर्माण झाली ती जगासमोर आहेच.


Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क