Skip to main content

चमडी डॉट कॉम...

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीची ज्ञात लग्न अज्ञात लफडी यामुळे ती बातमी अनेकांनी फार चवीनं दाखवली. हा सगळा प्रकार होता त्याला बोली भाषेत चमडीगिरी म्हणतात,  या चमडीगिरीमध्ये अडकलेल्या अनेकांचे हाल आज इंद्राणीच्या आजी माजी पती, तिच्यावर प्रेम करणा-यांचे झालेत तसेच होतात.
बातम्या करताना अनेक लोकांशी संबंध येतो त्यावेळी बोलत असताना हा शब्द हमखास ऐकायला मिळतो, भाई तो एक नंबरचा चमडी आहे हां..अनेकदा राजकारणी, अधिकारी वकील, पत्रकार, डॉक्टर  हे देखील या चमडीगिरीत अडकलेले बघायला मिळतात. 


यातले अनेक जण सुरूवातीला वासू असतात, वास काढत फिरत असतात. एखादी सुंदर महिला दिसली की यांचं काम सुरू होतं. तिला फिरवण्यासाठी ते काय पण करायला तयार असतात, अर्थात याला वयोमर्यादा अजिबात नसते, 60 वर्ष पूर्ण केलेले म्हातारे पण तरूण पोरींना, महिलांना घेऊन फिरताना बघायला मिळतात.  या सगळ्यांचा शेवट हा एकतर त्या महिलेच्या हातून मार खाण्यात होतो, एखाद्या लफड्यात अडकण्यात होतो, किंवा बायकोच्या हातचा सगळ्यांच्या समोर मार खाण्यात होतो. 

हे चित्र प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आलेलं आहे

तरीही यातल्या काहींची हौस फार दांडगी असते. मार खाल्ला, लफडी झाली तरी हे चमडी पब्लिक गरजू महिलेला खांदा द्यायला तयारच असतात. तनू वेडस मनू-2 मध्ये जिम्मी शेरगिल त्यातल्याच एका कॅरेक्क्टरला प्रश्न विचारतो "तू कौन, (तो समोरचा उत्तर देतो ) भैय्या हम कंधा...आपने छोड दिया तो डॉक्टरसाब ने दे दिया, उन्होने छोडा तो हमने दे दिया, हम छोड देंगे ता आप दे देना" असे अनेक खांदे आपल्या आजूबाजूला सतत फिरत असतात.  

याचा फायदा काही महिला घेतात आणि स्वत:चा स्वार्थ साधतात. महिला ऑफिसमधलीच असेल तर अशावेळी अनेकदा पुरूष कर्मचा-यांवर प्रचंड अन्याय झालेला बघायला मिळतो, पण बोलायचं कोणाकडे ? बॉसकडे गेलो तर तो बॉस स्वत: खांदा देणारा असतो, किंवा खांदा देणारा बॉसचा गोटी तरी असतो. इथे हक्क-बिक्क मागून काही चालत नाही, असं काही झालं तर ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढलं जाण्याची शक्यता असते. 

काही प्रकरणं कानावर येतात, त्यातलं एक प्रकरण असं आहे की एका सदगृहस्थाचं लग्न झालेलं होतं. तरीही त्यांना एक मुलगी आवडायला लागली. ते तिच्याबरोबर व्यवस्थित फिरायला वैगरे लागले.  मग कामानिमित्त टूर्स पण व्हायला लागल्या, काही दिवसांनी भाऊ घरी कमी आणि टूर्सवरच जास्त दिसायला लागले. बायकोला कळालं की आपला नवरा असले धंदे करतोय.त्याला धडा कसा शिकवायचा असा विचार करत असताना त्या बायकोलाही खांदा मिळाला, मग काय आनंदी आनंद झाला.  आज हे दोघेही नवरा-बायको आपलं नातं नावापुरता टीकवून आहेत, कारण समाजात हे नातं टिकवणं गरजेचं असतं.


हे चित्र प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आलेलं आहे
दुस-या एका प्रसंगात पन्नाशी गाठलेल्या एका खांद्यानं फेसबुकवर 34 वर्षांच्या (तरूणी म्हणावं का महिला हा प्रश्न आहे) एका तरूणीला आधार दिला. तरूणीला माहितीच नव्हतं की हा भाऊ लग्न झालेला आहे, त्याला दोन मुलं आहेत. एकेदिवशी खांद्याच्या बायकोला कळालं की आपला नवरा कोणाबरोबर तरी चॅटींग करतोय. बायकोनं गपचूप पद्धतीनं नवऱ्याच्या अकाऊंटवरून त्या तरूणीला एके ठिकाणी भेटायला बोलावलं. ज्या मॉलमध्ये भेटायला बोलावलं त्या मॉलमधल्या लोकांना दोन महिलांची फ्रीस्टाईल कुस्ती बघायला मिळाली. त्या नवऱ्याचं घरी काय झालं असेल कोणास ठाऊक.

असे अनेक प्रसंग आहे जे बघितलेले आहेत, माहिती आहेत. शीना बोरा प्रकरणातील इंद्राणीनं देखील असे बरेचसे खांदे शोधले असतील त्यातून जी गुंतागुंत निर्माण झाली ती जगासमोर आहेच.


Comments

Popular posts from this blog

एका बादलीनं जग बदलेल

                                आत्तापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती ती म्हणजे पाण्याचं संकट हे दरवर्षी मोठं बनत जाणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येतायत, भविष्यातही हे प्रयोग होत राहतील. जलशिवार योजना असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी आपलं नाव अमर व्हावं यासाठी पृथ्वी बंधारे बांधण्याची सुरू केलेली योजना असेल, प्रयत्न सुरू आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर कोणतीही योजना यशस्वी होऊच शकत नाही. मग काय करायचं ?   हातावर हात धरून मांडी घालून पाणी समस्या किती भीषण आहे हो अशी चर्चा करत बसायची ? ज्यांना काहीच करायचं नाही ते काहीच करणार नाही, पण ज्यांना खरोखर काहीतरी करायचंय ते नक्की करू शकतील. वारकरी संप्रदायानं कुटुंब कबिला असणारा-यांना आध्यात्म कळू शकतं, आणि देवापर्यंत पोचता येऊ शकतं हा मार्ग दाखवून दिला. चळवळीच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. काही चळवळ दरवेळी रस्त्यावर उतरून करायला लागते असं नाही, करायची असेल तर ती कशीही करता येते...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...