Skip to main content

वारी भाग - 1


वारी सुरू झालीय. स्टार माझामध्ये असताना दोन वर्ष वारी कव्हर केली. गेली दोन-तीन वर्ष काही जायला मिळालं नाही. वारी हे दोन शब्द आजही ऐकले की नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. शून्य माहिती होती वारीबद्दल, पण वारी हा विषय असा आहे की तो पाठांतर आणि रिसर्च करण्यापेक्षा स्वत अनुभवून लोकांपर्यत पोचवणं जास्त सोपं असतं. अनेक लोकं स्वतला वारी स्पेशल तज्ञ म्हणवतात, पण वारीतला खरा तज्ञ असतो तो मैलो-न-मैल चालणारा वारकरी, जो कधीच काहीच बोलत नाही.


शहरात राहणा-या मंडळींचं वारीबद्दलचं ज्ञान म्हणजे खेडड्यातल्या गावंढळ लोकांची एक यात्रा एवढंच असतं. मात्र ही यात्रा नसून जीवन म्हणजे काय हे देहू-आळंदी ते पंढरपूर या प्रवासादरम्यान समजवून सांगणारा प्रवास असतो. वारी बदलत चालली आहे. शेतक-यांबरोबर हायप्रोफाईल लोकंही वारीत सहभागी होतात, अविनाश भोसले आपल्या लव्याजम्यासोबत वारीत चालतात, आय.टी.वाले , विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी वारीत जेवढं जमेल तेवढं अंतर पार करताना दिसतात. कित्येक विदेशी मंडळीही दिंड्या,पताका घेऊन चालताना दिसतात.

एरवी ज्यांच्याकडे लोकं पहातही नाही अशी मंडळी वारीतले हिरो असतात. प्रत्येक दिंडीमध्ये असणारे वीणेकरी, टाळ वाजवणारे, मृदंग वाजवणारे आणि अशा कित्येक जणांना दिंडीमध्ये अत्यंत मानाने वागवलं जातं. वारक-याला ,दिंडीला, वारीला शिस्त असते ती शिस्त कधीच मोडलेली बघायला मिळत नाही. जी लोकं भारतीयांच्या बेशिस्तीबद्दल शिव्या घालतात त्यांना खास या वारीमध्ये पंगतीत बसवून हिरव्या मिर्चीचा खर्डा आणि बंद झालेल्या नाकातूनही पाणी काढण्याची ताकद असलेली रस्सा भाजी खाऊ घालण्याची मला फार इच्छा आहे.

वारी कव्हर करताना असे प्रसंग बघितले की मी मूळापासून हादरलो होतो. मी माझा कॅमेरामन धीरज आणि त्याचा अटेंडंट संदीप गाडीतून जात असताना 100 पेक्षा जास्त वय असलेला एक म्हातारा भेटला, त्याला धड चालताही येत नव्हतं, डोळ्याने नीट दिसत नव्हतं, आणि ऐकायलाही येत नव्हतं. जमिनीवर बसून तो पंढरपूरच्या दिशेनं सरकत सरकत जात होता. आम्हाला दया आली त्याला गाडीत बसवला आणि पुढे निघालो. धीरज त्या म्हाता-याची मस्करी करण्याचा प्रयत्न करत होता. पण जेव्हा त्याने त्याची कहाणी सांगितली तेव्हा धीरज पण गप्प बसला. त्या म्हाता-या बाबाचं नाव आठवत नाही पण तो मूळचा अहमदनगरचा राहणारा होता. मुलाला त्याने सांगितलं वारीला जायचंय. मुलानं नकार दिला, तर हा म्हातारा (खिशात एक पैसाही नव्हता) पळून वारीला आला. त्याच्या घरच्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला की माहित नाही. आम्ही त्याला विचारलं तू बसून का चालतो तर त्याने पाय दाखवले (अनवाणीच चाललेला) पायाला फोड आलेले, चालल्याने ते फुटलेले आणि जखमा झालेल्या तरीही तो पंढरपूरला चाललेला. वारीत आपापल्या पद्धतीने सेवा करणारी अनेक मंडळी असतात. लोणी काळभोरचा एक तरूण डॉक्टर रतन काळभोर कोणत्याही वारक-याची मोफत सेवा करायचा. आम्ही त्याला फोन केला आणि त्या म्हाता-या बाबाला त्याच्यापर्यंत पोचवला. त्या म्हाता-याच्या चेह-यावर कुठेही दुख नव्हतं, कुठेही थकवा नव्हता(शरीरात थकवा होता कारण रतन काळभोर ने माझ्यामते त्याला सलाईन लावली होती) उपचार झाल्यानंतर तो म्हातारा परत गायब झाला. वारी संपताना पंढरपूरच्या जवळ तोच म्हातारा मला पुन्हा खुरडत सरकताना दिसला. आता या जिद्दीला आणि चिकाटीला काय म्हणाचं हेच मला कळत नव्हतं। माझ्यासारखा असता तर केव्हाच कोलमडून पडला असता आणि परत फिरला असता.यावेळी आम्ही त्या म्हाता-याला पुन्हा गाडी भरला आणि थेट पंढरपूरपर्यंत नेऊन पोचवलं.

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क