Skip to main content

शाळा (भाग2)

आमची शाळा मध्यमवर्गीयांची होती, यातही बरेच विद्यार्थी असे होते ज्यांचे पालक जीवतोड मेहनत करून मिळेल त्यातल्या पैशातून कसंही करून मुलाला शिकवायचंच या जिद्दीने मुलांना शिकवणारे होते. अशा मुलांना अगदी नाममात्र म्हणजे 5 किंवा 10 रूपये फी पण परवडायची नाही त्यांच्याकडून सहलीसाठी पैसे कुठून मागायचे हा पण एक मोठा प्रश्नच होता. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फारसा कोणी प्रयत्नच केला नाही.

जवळपास दिड वर्षापूर्वी शाळेत आमच्याबरोबर असलेले जे-जे जमतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. एकमेकांची विचारपूस करत असताना प्रत्येकजण आता काय करतोय हे कळत होतं. दहावीपर्यंत नुसता उंडगत फिरणारा आनंद संचेती आता इंजनिअर झाला, फॉरेनला गेला, नापास झाल्होयामुळे आमच्या बरोबर आलेला आणि नंतर आमच्याच बरोबरचा झालेला अमित कदम स्व:तचं दुकान चालवतो (आणि ते ही अतिशय उत्तम पद्धतीने) सायन्स करून कॉलेजमधून बाहेर पडलेला निलेश पाटील केमिकल चा प्लॅन्ट एकट्याच्या जीवावर उभा करू शकतो. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त रस असलेला प्रीतम परब एक मल्टीनॅशनल बँकेत मोठ्या पदावर आहे. जयेश जोशी स्वतची इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी चालवतोय (सगळ्यांची माहिती आठवत नाही पण प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात नाव कमवताना दिसत होती) अशी असंख्य मुलं भेटत होती आणि ती मला नव्याने कळत होती.

शाळेने मला काय दिलं याबद्दल मी नेहमी विचार करतो, आणि नेहमी मी ज्या उत्तरापाशी येतो ते उत्तर असतं काहीही नाहीशाळेत जातानाही पाटी कोरी होती आणि बाहेर पडतानाही कोरीच होती. शाळेतली मुलं काय करू शकतात याचा अंदाज कोणालाच नव्हता. याचं मुक्य कारण या मुलांना फक्त शिक्षण हे जगात उपयोगी पुडणारं नाहीये, त्याही पेक्षा जास्त काहीतरी त्यांना कळायला हवं हे शिक्षकांना उमगतच नव्हतं. मराठीचा वर्ग चित्रकलेच्या बाई घेणार, चित्रकलेचा वर्ग गणिताच्या बाई घेणार अशी पर्यायी पद्धत शाळेत राबवली जात होती. एकाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीचं फार ज्ञान नाही ती व्यक्ती मुलांना कशी शिकवत असेल याचं उत्तर मला आजही सापडत नाही. जेव्हा शाळेतली मुलं एकत्र भेटली तेव्हा एक विचार पुढे आला की आपल्यातल्या प्रत्येकाने आताच्या मुलांना आपापल्या क्षेत्राबद्दल थोडी जरी माहिती दिली किंवा आपल्या कामाचा वापर त्यांना वेगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी केला तर खूप फरक पडू शकेल. (आपल्याला जे मिळालं नाही ते या मुलांना तरी मिळावं ही या मागची भावना होती)

पण ही एकतर्फी गोष्ट होती, शाळेनं शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती जणांशी संवाद ठेवला ? किती माजी विद्यार्थ्यांना अडचणी सांगितल्या ? या दोन गोष्टी जरी माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या तर ते शाळेला मदत करणार नाहीत का ? परिस्थिती बदलण्यासाठी फारसे प्रयत्न कोणीच करताना दिसत नाही ना शाळा ना माजी विद्यार्थी. कदाचित हा ब्लॉग वाचल्यावर परिस्थिती काही अंशी बदलेल असं वाटतंय, पाहूयात...

Comments

  1. खुप छान लिहलंय.. अगदी नॉस्टेलजीक आहे.. तुला पडलेला प्रश्न सर्वांनाच पडतो शाळा-क़ॉलेजनं काय दिलं.. मला इथं तुला एक तेगलू सिनेमा सजेस्ट करावासा वाटतोय.. हैपी डेज... या सिनेमातल्या हिरोला चंदूला ही कॉलेजच्या शेवटच्या दिवशी हाच प्रश्न पडतो. कॉलेजमध्ये येऊन आपण काय मिळवलं. त्यावेळी त्याचा प्राध्यापक आणि चंदूतला संवाद तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल.. मुळ तेगलुत असलेल्या संवादाचं इंग्रजी सबटायटल ट्रान्सलेशन...

    Chandu -
    This is my college.
    For four years, my home.
    No Idea..
    Suddenly, I felt it shockingly.
    As if I am leaving this home.
    Water swirled in my eyes..
    No idea.. A weakening feeling..
    Suddenly, I heard dad's words clearly.
    What did you achieve?
    college is about to finish
    I have no idea what to do
    I dont know what I achieved.
    I dont want to leave this home.
    Am I afraid of outside world?
    Or love towards college?
    This much of confusion...
    I feel every one else is feeling fine.
    Every one has some thing to do in life..
    What about me?

    Sir - Why are you sitting here?

    Chandu - Nothing much sir.
    What did I Learn?
    What did I achieve?
    I'm in just as much confusion as when I joined college.

    Sir - Chandu.. Never think like that.
    Ofcourse you have learnt. you learnt to differentiate between right and wrong.
    you learnt to differentiate between right and wrong.
    Learnt how to help people who are weaker than you.
    What's sacrifice..
    What's good friendship..
    You know all these now.
    Nobody comes to college for achieving.
    They come to earn capacity to achieve.

    ReplyDelete
  2. lai bhari.. patrakar saheb..

    ReplyDelete
  3. Shaalene aaplyala kaay dile, Hya prashnacha uttar tu shodhnyacha prayatna kelaas, pan nakki tula kaay apekshit hote he kaahi kale na. Partly, you have answered your question yourself, School was charging less than nominal fees. Without any big funding, expecting exceptional teachers, teaching methodologies, is overkill I believe. What we got from school cannot be weighed/ compared.


    In general we forget the value of some of the basic learnings when we go for so called 'higher' educations, but in nutshell whatever you are today, whatever I am today and for that matter whatever everyone of us could achieve today has its root in our school..

    Thats how I look at it... So dont be so critical about the school that gave you so many wonderful memories, friends, your basic skills... :-)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क