Skip to main content

खाणा-याने खात सुटावे....

ईटीव्हीत जगणं सुसह्य करणा-या काही निवडक गोष्टी होत्या. त्यामध्ये खाणं ही सगळ्यात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट होती. हैद्राबादची ओळख ही तिथल्या बिर्याणी मुळे आहे. आम्ही ज्या ठिकाणी रहायचो (दिलसुखनगर भागात) तिथे वडापावच्या गाड्यांप्रमाणे बिर्याणीची छोटी दुकानं असायची. फक्त दिलसुखनगरच नाही तर जवळपास संपूर्ण हैद्राबादमध्ये अशा पद्धतीची दुकानं दिसून यायची. एका बिर्याणीमध्ये दोन जणांचं काम भागायचं. 70 ते 80 रूपयांमध्ये एका वेळचं पूर्ण जेवण बिर्याणीमुळे होऊन जायचं. अमित जोशीला फिरण्याची बरीच आवड होती. एकदा अमित एकटाच सिकंदराबाद भागात गेला होता तिथं अल्फा नावाच्या हॉटेलमधली बिर्याणी त्याला एवढी आवडली की दोन माणसांची बिर्याणी त्याने एक ब्रेक घेऊन संपवून टाकली. (बिर्याणी एका माणसानं संपवणं ही अशक्यप्राय गोष्ट होती) सांगायचं तात्पर्य की बिर्याणीची चव ही आयुष्यभर स्मरणात राहील अशी होती.

सकाळी नाश्त्यासाठी पुन्हा छोट्या दुकानांचा आधार घ्यावा लागयचा. रस्त्याच्या कडेला अनेक स्नॅक्स कॉर्नर दियायचे. इथे इडली, डोसा, पासून टॉमेटो भात बिसिबेळी हुळ्ळीअन्ना( मला या पदार्थाचं नाव ऐकूनच तो न खाण्याची इच्छा व्हायची) सगळं मिळायचं आणि ते ही फार कमी दरामध्ये (आमच्यासाठी हीच महत्वाची गोष्ट होती). या स्नॅक्स कॉर्नरव्यतिरिक्त आमच्या घरातून बाहेर पडल्यानंतर थोडं दूर एका मुसलमान चाचाचं हॉटेल होतं. बाहेरून दिसायला टिनपाट हॉटेल होतं मात्र इथं मिळणारी पुरी आणि बटाट्याची पातळ भाजी आणि चहा या दोन गोष्टी फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाच्या तोंडात मारेल अशा होत्या.

ऑफीसच्या परिसरात मात्र खाण्यापिण्याचा दुष्काळ होता. नाईच शिफ्टला जिन्यात येणारी ईडली आणि रात्री उशिरापर्यंत कॅन्टीमध्ये मिळणारे समोसे आणि पफ या दोन गोष्टींच्या जीवावर कित्येक ईटीव्हीयन्सनी दिवस काढले असतील. जे जेवण कॅन्टीनला मिळायचं ते देखील बघून न खाण्याची जास्त इच्छा व्हायची. सतत मिळणारा अर्धा कच्चा भात, सांबार आणि कुछकुठल्या भाज्या असे पदार्थ थाळीत असायचे.

आमच्या घरात प्रत्येक जण चवीनं खाणारा होता. आशिष चांदोरकर, सचिन फुलपगारे, मी राजेंद्र हुंजे या सगळ्या मंडळींनी गुढी पाडवा साजरा करायचं ठरवलं. गुढीसाठी भगवं वस्त्र आणलं, कलश नसल्याने तांब्या घेतला आणि आंघोळपांघोळ करून सगळ्यांनी गुढी ऊभारली. आजूबाजूच्या मंडळींना आम्ही हे काय करतोय काहीच कळत नव्हतं. गुढी ऊभारली, आता पुढे काय... गोडाचं जेवण पाहीजेच. पण मराठी पदार्थ मिळणार कुठे ? प्रत्येकाने आपापली अक्कल लढवली, मी आणि सचिन श्रीखंड शोधायला बाहेर पडलो. (हैद्राबादमध्ये श्रीखंड शोधणं हे वाळवंटात पाणी शोधण्यापेक्षा कठीण काम होतं हे तेव्हा कळालं) घरी आशिष आणि हुंजे ने पु-या बनवायला घेतल्या. आमच्या घराच्या समोरच राहणा-या केतकी लोणकर-जोशीने बटाट्याची भाजी आणि काहीबाही पदार्थ बनवले होतं. कायकाय उपद्व्याप करून सगळ्यांनी अथक प्रयत्नांनी मराठमोळ्या पद्धतीचं जेवण बनवलं आणि पंचपक्वान्न मिळाल्याच्या आनंदात फस्त केलं.

यामुळेच जसं मी म्हटलं तसं ईटीव्हीमधलं जीवन हे विविध खाद्यपदार्थांनी ख-या अर्थानं सुसह्य केलं होतं

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क