Skip to main content

मंतरलेले दिवस

ई टीव्ही सोडलं तरी त्या चॅनलशी असलेली जवळीक ही आयुष्यभर आहे तशीच राहील...अनेक बरे वाईट प्रसंग या चॅनलमध्ये काम करताना अनुभवायला मिळाले. अनुभवाची पहिली पायरी म्हणून ज्या संस्थेची ओळख आहे त्या संस्थेत काम करताना नेहमीच काही ना काही शिकून माणसं बाहेर पडली आहेत. मी ही त्याला अपवाद नव्हतो...या संस्थेशी असलेल्या जवळकीमुळेच सोबत काम करणारे कोणी भेटले तर मस्त धमाल येते. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना ईटीव्हीतला एक जुना मित्र सचिन गडहिरे वारंवार भेटत असतो. अर्थसंकल्पाच्या दिवशी आम्ही योगायोगाने एकत्र बसलो होतो. तेव्हा बोलता बोलता तो सहज बोलून गेला की ईटीव्हीत होती तशी मजा आता काही येत नाही (काही लोकं 8 तास सरकारी ड्युटी मुळे खूश असायची) त्याच्या बोलण्यातला अर्थ थोडा वेगळा होता कारण आम्ही एकत्र हैद्राबाद आणि मुंबई दोन्हीकडे काम केलं होतं. खासकरून आशिष चांदोरकर आणि सचिन गडहिरेला वरिष्ठांना उलट बोललण्यामुळे सलग काही आठवडे नाईट शिफ्ट देण्यात आली होती, या दोघांबरोबर मी आणि सचिन फुलपगारे (या दोघांचे हेल्पर म्हणून) आमचीही डुयटी लावण्यात आली होती. आमच्या चौघांमध्ये नेहमीच कॉर्डीनेशन जबरदस्त होतं ज्यामुळे नाईट शिफ्ट कोणत्याही त्रासाशिवाय पार पडली (फक्त पहाटे भयंकर झोप यायची, त्यावरही मात कशी केली हे माझं मलाच माहित आहे)

ईटीव्हीयन्स आजही अनेक ठिकाणी एकत्र काम करत असतात, पार्टीमध्ये भेटत असतात, त्यांच्यामध्ये कटु प्रसंग आलेले मी फार क्वचित पाहीलेले आहेत. प्रत्येक संस्थेमध्ये मग तो चॅनल असो किंवा पेपर एक तरी ईटीव्हीमधला माणूस शंभर टक्के असणारच... आय.बी.एन 7 मध्ये आलो तेव्हा बंडू शेठ शिरीश जाधव जाधव, दिपक शितोळे , सचिन जोशी आणि केतकी लोणकर-जोशी (जिला मी नेहमी चेटकू चिडवायचो) हे दांपत्य अशी अनेक मंडळी नव्या संस्थेत पुन्हा नव्याने भेटली. बरं वाटतं या सगळ्यांना पुन्हा भेटून, फक्त हीच मंडळी नाहीतर अनेक कॅमेरामन देखील भेटले ज्यात, गणेश काळे, दिपेश शिंदे, प्रवीण शेट्टी, उमेश गोविलकर, पडवळकर आणि अनेक मंडळी भेटली. प्रत्येक वेळा जाणवतं की मधल्या काळात काही कारणांमुळे संवाद तुटला असला तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. जेव्हा सगळे एक दुस-यासमोर येतात तेव्हा पुन्हा पहिल्यासारखेच मित्र झालेले असतात.

हैद्राबादला काम करत असताना माझ्या बरोबर राहणा-या, सचिन फुलपगारे, आशिष चांदोरकर, अमित जोशी, सचिन देशपांडे, राजेंद्र हुंजे ही मंडळी आज वेदवेगळ्या ठिकाणी आहेत. मात्र यातलं कोणीही कुठेही भेटलं तरी जुन्या आठवणी निघाल्या नाही असं कधीच झालेलं नाही. बरेच दिवसांपासून ईटीव्ही च्या दिवसांबद्दल लिहायचं मनात आहे पण जमत नाहीये. लिहण्यासारखं बरंच आहे पण कुठून आणि कसं सुरू करायचं हा मोठा प्रश्न आहे. आपल्यापैकी कोणी मदत केली तर नक्की आनंद होईल.

Comments

Popular posts from this blog

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि ...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...