Skip to main content

मंतरलेले दिवस

ई टीव्ही सोडलं तरी त्या चॅनलशी असलेली जवळीक ही आयुष्यभर आहे तशीच राहील...अनेक बरे वाईट प्रसंग या चॅनलमध्ये काम करताना अनुभवायला मिळाले. अनुभवाची पहिली पायरी म्हणून ज्या संस्थेची ओळख आहे त्या संस्थेत काम करताना नेहमीच काही ना काही शिकून माणसं बाहेर पडली आहेत. मी ही त्याला अपवाद नव्हतो...या संस्थेशी असलेल्या जवळकीमुळेच सोबत काम करणारे कोणी भेटले तर मस्त धमाल येते. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना ईटीव्हीतला एक जुना मित्र सचिन गडहिरे वारंवार भेटत असतो. अर्थसंकल्पाच्या दिवशी आम्ही योगायोगाने एकत्र बसलो होतो. तेव्हा बोलता बोलता तो सहज बोलून गेला की ईटीव्हीत होती तशी मजा आता काही येत नाही (काही लोकं 8 तास सरकारी ड्युटी मुळे खूश असायची) त्याच्या बोलण्यातला अर्थ थोडा वेगळा होता कारण आम्ही एकत्र हैद्राबाद आणि मुंबई दोन्हीकडे काम केलं होतं. खासकरून आशिष चांदोरकर आणि सचिन गडहिरेला वरिष्ठांना उलट बोललण्यामुळे सलग काही आठवडे नाईट शिफ्ट देण्यात आली होती, या दोघांबरोबर मी आणि सचिन फुलपगारे (या दोघांचे हेल्पर म्हणून) आमचीही डुयटी लावण्यात आली होती. आमच्या चौघांमध्ये नेहमीच कॉर्डीनेशन जबरदस्त होतं ज्यामुळे नाईट शिफ्ट कोणत्याही त्रासाशिवाय पार पडली (फक्त पहाटे भयंकर झोप यायची, त्यावरही मात कशी केली हे माझं मलाच माहित आहे)

ईटीव्हीयन्स आजही अनेक ठिकाणी एकत्र काम करत असतात, पार्टीमध्ये भेटत असतात, त्यांच्यामध्ये कटु प्रसंग आलेले मी फार क्वचित पाहीलेले आहेत. प्रत्येक संस्थेमध्ये मग तो चॅनल असो किंवा पेपर एक तरी ईटीव्हीमधला माणूस शंभर टक्के असणारच... आय.बी.एन 7 मध्ये आलो तेव्हा बंडू शेठ शिरीश जाधव जाधव, दिपक शितोळे , सचिन जोशी आणि केतकी लोणकर-जोशी (जिला मी नेहमी चेटकू चिडवायचो) हे दांपत्य अशी अनेक मंडळी नव्या संस्थेत पुन्हा नव्याने भेटली. बरं वाटतं या सगळ्यांना पुन्हा भेटून, फक्त हीच मंडळी नाहीतर अनेक कॅमेरामन देखील भेटले ज्यात, गणेश काळे, दिपेश शिंदे, प्रवीण शेट्टी, उमेश गोविलकर, पडवळकर आणि अनेक मंडळी भेटली. प्रत्येक वेळा जाणवतं की मधल्या काळात काही कारणांमुळे संवाद तुटला असला तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. जेव्हा सगळे एक दुस-यासमोर येतात तेव्हा पुन्हा पहिल्यासारखेच मित्र झालेले असतात.

हैद्राबादला काम करत असताना माझ्या बरोबर राहणा-या, सचिन फुलपगारे, आशिष चांदोरकर, अमित जोशी, सचिन देशपांडे, राजेंद्र हुंजे ही मंडळी आज वेदवेगळ्या ठिकाणी आहेत. मात्र यातलं कोणीही कुठेही भेटलं तरी जुन्या आठवणी निघाल्या नाही असं कधीच झालेलं नाही. बरेच दिवसांपासून ईटीव्ही च्या दिवसांबद्दल लिहायचं मनात आहे पण जमत नाहीये. लिहण्यासारखं बरंच आहे पण कुठून आणि कसं सुरू करायचं हा मोठा प्रश्न आहे. आपल्यापैकी कोणी मदत केली तर नक्की आनंद होईल.

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या पोलीस स्

शेकडो चुका करूनही आनंदात जगणारे खाते

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या देशात पावसाचं प्रचंड महत्व आहे. हवामान खातं हे देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खातं मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात या हवामान खात्याची कामगिरी इतकी ढिसाळ होत चाललीय की या खात्याने वर्तवलेले अंदाज शंभर टक्के चुकतातच याची खात्री शेतकरी सोडा सामान्य माणसालाही झाली आहे.  मी लहान असताना घरामध्ये रेडियोवर किंवा टीव्हीवर बातम्यांच्या शेवटी हवामानाचा अंदाज सांगितला जायचा. माझ्यासाठी तेव्हा ती बातम्या संपल्या याची खूण होती. कालांतराने हवामानाचा अंदाज याचं स्थान खासगी वृत्तवाहिन्यांवर बदललं शेवटाच्या जागी पहिली बातमी म्हणून अंदाज दाखवले जाऊ लागले. तेव्हापासून आतातपर्यंतचा माझा अनुभव हाच आहे की यातील ९० टक्के अंदाज चुकायचे. तुफान पाऊस पडायच्या एक दिवस आधी कधीही त्याबाबतचा अंदाज ऐकलेला मला तरी आठवत नाहीये. २६ जुलैचा पाऊस असो, किंवा दरवर्षी मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक ही शहरं ठप्प करणारा वादळवाऱ्यांचा पाऊस असो त्याबाबतचा अंदाज कोणीही वर्तवलेला किंवा बातम्यांमध्य

आठवड्याला दोन सुट्ट्या हव्यात, मग नाईट शिफ्ट का नको?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की त्यांनाही प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा म्हणजेच त्यांना दोन दिवसांची सुट्टी दर आठवड्याला देण्यात यावी. विषयावर मतदान घेतलं तर या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा ‘ नकोच ’   अशी मतं जास्त असतील याची मला खात्री आहे.  मंत्रालय हे काही माझं कायमस्वरूपी बीट नव्हतं, मात्र जेव्हा केव्हा मी मंत्रालयात जायचो तेव्हा ही इमारत अंगावर आल्यासारखी वाटायची. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गळ्यात आयकार्ड घालणं सक्तीचं केलं असल्याने मी आरसा गेटबाहेर कॅमेराची वाट बघत उभा असताना, नुसत्या गप्पा हाणत, पान-तंबाखू खात उभी असलेली शेकडो कर्मचारी मंडळी मला दिसायची. तेव्हा नीट वेळेचा हिशोब ठेवला नाही. मात्र किमान अर्धा ते पाऊण तास तरी ती उभी असायची. साधारणपणे दुपारी १ च्या आसपासचा हा काळ असायचा. मी सहज म्हणून चौकशी केली होती तेव्हा मंत्रालयातीलच कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की जवळपास एक तास माणसं जेवणात घालवतात, त्यानंतर माणसं फेरफटका मारायला बाहेर पडतात, पान खाऊन, गप्पा मारून आरामात परत येतात आणि निघायला क