Skip to main content

सीमोल्लंघन

साचलेपण कधीच चांगल नसत...म्हणून कधी कधी भावनांच्या आहारी ना जाता मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागतो. असाच निर्णय मी स्टार माझा सोडताना घेतला, अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून रस्त्याचा शेवट शोधण्यापेक्षा मीच थांबायच ठरवल. सुरवात मराठी पत्रकराना घडवणाऱ्या ई टी व्ही मराठी पासून केल्या नंतर अस वाटल ही नव्ह्त की प्रवास करत इथपर्यंत येईन.

राजीनामा देऊन शेवटच्या दिवशी काम संपेपर्यंत जबरदस्त दडपण आल होत. एक तर काही लोकाना मी का जातोय आणि मला थांबवत का नाहीत हा प्रश्न पडला होता. त्यांच्या प्रमाणे तो मला ही सतावत होता, पण माझा निर्णय हा नक्की असल्याने त्याकडे मी जस्ता लक्ष दिला नाही. जाता जाता स्टार माझा चे संपादक राजीव खांडेकरानी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना सांगितलेला एक वाक्य मला कायम आठवणीत राहिल...पिच कोणतीही असो स्कोर करण हे तुझ काम आहे. त्यानी सांगितलेल वाक्य लक्षात ठेवत बाद न होता नवी इनिंग सुरु करण्याचा निर्णय पक्का केला. हिंदी वहिन्या आणि त्यासाठी काम करणार्या मराठी पत्रकारांमधे आता माझाही समावेश झाला.

ई.टी.व्ही चे राजेंद्र साठे आणि स्टार माझा चे राजीव खांडेकर ही माणस दिसायला जरी साधी असली तरी ती किती ग्रेट आहेत हे त्यांच्या बरोबर काम करताना जाणवत. आता साथ लाभणार आहे ती रविन्द्र आम्बेकर यांची. खर तर ई.टी.व्ही मधे इनटर्न शिप करतानाच मी रविच्या कामाची पद्धत बघितली होती, जे काम करायच ते मोठच करायच हा तेव्हापासून त्याचा खाक्या होता...पुन्हा त्याच्या हाताखाली काम करायला मिळाल्याने बर वाटतय. आता नव्या कप्तानाच्या हाताखाली नवी इनिंग सुरु करतोय. भेटूच पुन्हा...

Comments

Popular posts from this blog

एका बादलीनं जग बदलेल

                                आत्तापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती ती म्हणजे पाण्याचं संकट हे दरवर्षी मोठं बनत जाणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येतायत, भविष्यातही हे प्रयोग होत राहतील. जलशिवार योजना असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी आपलं नाव अमर व्हावं यासाठी पृथ्वी बंधारे बांधण्याची सुरू केलेली योजना असेल, प्रयत्न सुरू आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर कोणतीही योजना यशस्वी होऊच शकत नाही. मग काय करायचं ?   हातावर हात धरून मांडी घालून पाणी समस्या किती भीषण आहे हो अशी चर्चा करत बसायची ? ज्यांना काहीच करायचं नाही ते काहीच करणार नाही, पण ज्यांना खरोखर काहीतरी करायचंय ते नक्की करू शकतील. वारकरी संप्रदायानं कुटुंब कबिला असणारा-यांना आध्यात्म कळू शकतं, आणि देवापर्यंत पोचता येऊ शकतं हा मार्ग दाखवून दिला. चळवळीच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. काही चळवळ दरवेळी रस्त्यावर उतरून करायला लागते असं नाही, करायची असेल तर ती कशीही करता येते...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...