Skip to main content

Posts

Showing posts from April, 2011

खाणा-याने खात सुटावे....

ईटीव्हीत जगणं सुसह्य करणा-या काही निवडक गोष्टी होत्या. त्यामध्ये खाणं ही सगळ्यात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट होती. हैद्राबादची ओळख ही तिथल्या बिर्याणी मुळे आहे. आम्ही ज्या ठिकाणी रहायचो (दिलसुखनगर भागात) तिथे वडापावच्या गाड्यांप्रमाणे बिर्याणीची छोटी दुकानं असायची. फक्त दिलसुखनगरच नाही तर जवळपास संपूर्ण हैद्राबादमध्ये अशा पद्धतीची दुकानं दिसून यायची. एका बिर्याणीमध्ये दोन जणांचं काम भागायचं. 70 ते 80 रूपयांमध्ये एका वेळचं पूर्ण जेवण बिर्याणीमुळे होऊन जायचं. अमित जोशीला फिरण्याची बरीच आवड होती. एकदा अमित एकटाच सिकंदराबाद भागात गेला होता तिथं “ अल्फा ” नावाच्या हॉटेलमधली बिर्याणी त्याला एवढी आवडली की दोन माणसांची बिर्याणी त्याने एक ब्रेक घेऊन संपवून टाकली. (बिर्याणी एका माणसानं संपवणं ही अशक्यप्राय गोष्ट होती) सांगायचं तात्पर्य की बिर्याणीची चव ही आयुष्यभर स्मरणात राहील अशी होती. सकाळी नाश्त्यासाठी पुन्हा छोट्या दुकानांचा आधार घ्यावा लागयचा. रस्त्याच्या कडेला अनेक स्नॅक्स कॉर्नर दियायचे. इथे इडली, डोसा, पासून टॉमेटो भात बिसिबेळी हुळ्ळीअन्ना( मला या पदार्थाचं नाव ऐकूनच तो न खाण्याच

ईटीव्ही नावाचा मॅरेज ब्युरो.

ईटीव्हीत असताना अनेक अनुभव आले...चांगले कमी आणि वाईट जास्त होते. सगळ्यात महत्वाचं तत्व जे मी ईटीव्हीतून किंवा आत्तापर्यंतच्या अनुभवातून शिकलो ते म्हणजे काहीच निश्चित आणि शाश्वत नसतं, आज एखादा माणूस वर दिसतो तो दुस-या दिवशी असा खाली आपटेल की कोणी विचारही करू शकत नाही. त्यामुळे झटपट वर जाण्याच्या नादात लोकांकडून फक्त शिव्याशाप खाणारे अनेकजण मी जवळून बघितलेत ( सोप्या समजणा-या भाषेत यांना चाटुकारिता करणारे म्हणतात) आपली मतं दुस-याला पटली नाहीत तर ती दुस-यावर लादण्यापेक्षा शांत बसावं हे मी या काळातच शिकलो.... ईटीव्हीला मिनी भारत म्हटलं जायचं...संपूर्ण भारतातून इथे लोकं काम करत होते, हैद्राबादमध्ये रहात होते. भारताप्रमाणेच इथंही लोकांमध्ये एकोपा होता, भांडणं होती, आणि कंपूगिरीही होती. प्रत्येकाने आपापला गट बनवला होता तसा तो माझाही होता. मी ,सचिन फुलपगारे , आशिष चांदोरकर, अमित जोशी आणि सचिन देशपांडे एका घरात रहायचो, पण भांडणंही जबरदस्त व्हायची...अमित जोशी पातेलंभर चहा करायचा (अमितसमोर हा विषय काढला तर तो अजूनही वैतागतो) कुकरभर खिचडी करायचा आणि नंतर सगळं एकतर स्वतच खायचा किंवा फेकून द्यायचा.

सुरूवात

नक्की दिवस आठवत नाही मात्र जवळपास 2002-2003 मध्ये मी ईटीव्हीमध्ये कामाला सुरवात केली. पहिली नोकरी, ती ही राज्याबाहेरची ,मुलगा एकटा बाहर जाणार कसा राहणार या काळजीने आईबाबा काहीसे चिंतेमध्ये होते. पण माझ्या मनात भीती नाही हे पाहून त्यांच्या मनातली भीती काहीशी कमी झाली होती. ही परिस्थिती फक्त माझ्या आईबाबांची होती असं नाही, नंतर आलेल्या अमित जोशी किंवा बाकीच्यांच्या घरीही जवळपास अशीच परिस्थिती होती. कामाचा कुठेही अनुभव नव्हता, पाटी कोरी होती असा परिस्थितीत हैद्राबादचं रामोजी फिल्म सिटीमधलं ईटीव्हीचं ऑफीस बघितलं की भांबावल्यासारखं व्हायचं. नवीन होतो चुका व्हायच्याच होत्या. त्याकाळी अशा चुका केल्या ज्या मागे वळून पाहताना वाटतं की अतिशय शुल्लक होत्या. पण या सगळ्या चुका अनुभव नसल्यामुळे झालेल्या चुका होत्या. व्हीज्युअल्स मध्ये ब्लॅक जाणं, लोकांची नावं चुकीची जाणं (नावं माहिती असायची पण स्लग ऍस्टन मधील तांत्रिक बाबींमुळे ती चुकायची) या काळात मेघराज पाटील, गजाभाऊ कदम ही मंडळी डेस्क सांभाळायची आणि त्यांच्यावर अशोक सुरवसे होते. "काही" चुका वरिष्ठांनी माफ केल्या काहींबद्दल समजा